नाशिक : पदवीधर मतदार संघाच्या उमेदवारीवरून सत्यजीत तांबे चांगलेच चर्चेत आले. त्यांनी अनपेक्षितपणे अपक्ष म्हणून आपला अर्ज दाखल झाल्याने मोठा गोंधळ निर्माण झाला. त्यामुळे त्यांच्यावर काॅंग्रेसने निलंबणीची कारवाई केली. यातच काॅंग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांचे तांबे जवळचे मानले जाते. त्यावर बाळासाहेब थोरातांचा सत्यजीत तांबे यांना छुपा पाठींबा आहे का? असा सवाल केला जात आहे. त्यावर आता काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
अखेर सत्यजीत तांबेंना भाजपकडून पाठिंबा..! एका रात्रीत सगळं चित्र बदलणार…?
बाळासाहेब थोरात हे पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत. ते माझेही नेते आहेत. त्यामुळे मी त्यांना आदेश देऊ शकत नाही. मात्र त्यांच्याशी झालेल्या बोलण्यानुसार ते पक्षासोबतच आहेत. या मतदारसंघात भाजपने तांबे यांना आतून पाठींबा दिल्याचे समोर आले असतांना काॅंग्रेसकडून आता थोरात यांची भूमिका अशा पद्धतीने स्पष्ट करण्यात आली आहे.
डॉ. सुधीर तांबे आणि सत्यजीत तांबे यांच्यासंबंधी आणि त्यानंतर त्यांना पाठिंबा देणाऱ्यांसंबंधी निर्णय घेताना पक्षाची काहीही चूक झालेली नाही. पक्षाचे नियम आणि शिस्तीप्रमाणेच सर्व प्रक्रिया झाली आहे. तांबे यांना भाजपचा पाठिंबा असणार याची कुणकुण आधीच लागली होती. आता भाजपने पाठिंबा दिला की नाही, हे मला माहिती नाही. असंही नाना पटोले यांनी सांगितले.
“शरद पवार हे भाजपविरोधी आघाडीचे प्रमुख स्तंभ, आदर ठेऊन बोला”,राऊतांनी आंबेडकरांना सुनावलं
राज्यात औरंगाबाद, अमरावती, कोकण, नागपुर आणि नाशिक याठिकाणी निवडणुका होत आहेत. विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंंघासाठी येत्या 30 जानेवारीला मतदान होत आहे. या निवडणुकांमध्ये नाशिकची पदवीधर मतदार संघाची निवडणुक अपक्ष आमदार डॉ. सत्यजीत तांबे यांच्यामुळे चर्चेत आली होती. यातच आता भाजपने या निवडणुकीबाबत मोठी बातमी समोर येत आहे.
Read also
- “बरं झालं शिवसेनेतून गद्दार गेले, अन् आम्हाला हिरा सापडला”; उद्धव ठाकरेंचं हिरेंच्या प्रवेशावेळी उद्गार
- “50 गद्दार मांडीवर बसवल्यानंतर भाजपला आमची गरज उरली नाही”, भाजपचा ‘हिरा’ ठाकरे गटात
- “राज्याच्या राजकारणात 2 प्लस 2, चार कधीच होणार नाही, ते मायनसमध्ये जातील”; मुख्यमंत्र्यांचा पलटवार
- शुभांगी पाटीलसाठी राष्ट्रवादी, काॅंग्रेस आणि शिवसेना मैदानात, विजय आपलाच होणार..!
- “ज्यांच्या नावाने राज्य चालवताय, त्यांचं दर्शन घ्यायाला मुख्यमंत्र्यांकडे वेळ नाही”