परिक्षा न घेता सरासरी गुण दिले गेले तर त्या विद्यार्थ्यांना “कोरोना ग्रॅज्युएट” किंवा “प्रमोटेड” असे संबोधले जाणार नाही ना? असा प्रश्न 1 जूनला आम्ही उपस्थित केला होता. त्यानंतर ही विद्यार्थ्यांवर हा दुर्दैवी शिक्का कोणी मारुन दाखवला? असा सवाल आशिष शेलार यांनी कृषिमंत्री दादाजी भुसे यांना ट्विटरच्या माध्यमातून केला आहे.
कोरोनाचे संकट आणि त्याचा वाढता प्रादुर्भाव यामुळे देशात असल्याने लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. कोणताही धोका नको म्हणून शाळा, महाविद्याल बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. तर काही विद्यार्थ्यांच्या परीक्षाही रद्द केल्या. मात्र कोविड-१९मुळे ज्यांच्या परीक्षा घेतलेल्या नाहीत अशांच्या गुणपत्रिकेवर ‘प्रमोटेड कोविड-१९’ असा शिक्का मारण्याचा अजब प्रकार कृषी विद्यापीठांत दिसून आला
दरम्यान, या सगळ्या वादाच्या पार्श्वभूमीवर राज्याचे कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी स्पष्टीकरण दिले. कृषीचे शिक्षण घेणार्या राज्यातील सर्व २८ हजार विद्यार्थ्यांना गुणपत्रिका आणि प्रमाणपत्र देताना त्यावर कोविडचा कोणताही शिक्का नसेल, असे सांगत दादा भुसे यांनी विद्यार्थी आणि पालकांना आश्वस्त केले.
या सर्व प्रकारानंतर आशिष शेलार यांनी विद्यार्थ्यांवर हा दुर्दैवी शिक्का कोणी मारुन दाखवला? असा सवाल दादाजी भुसे यांना केला तसेच कृषी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना मनस्ताप देणाऱ्यांवर आधी कारवाई करा अशी मागणी देखील आशिष शेलार यांनी केली आहे.
परिक्षा न घेता सरासरी गुण दिले गेले तर त्या विद्यार्थ्यांना "कोरोना ग्रॅज्युएट" किंवा "प्रमोटेड"असे संबोधले जाणार नाही ना? असा प्रश्न 1 जूनला आम्ही उपस्थित केला होता.
त्यानंतर ही विद्यार्थ्यांवर हा दुर्दैवी शिक्का कोणी मारुन दाखवला?
मा. कृषी मंत्री @dadajibhuse यांना सवाल! (1/2)— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) July 15, 2020
कृषी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना मनस्ताप देणाऱ्यांवर आधी कारवाई करा ! @BJP4Maharashtra @Dev_Fadnavis @ChDadaPatil pic.twitter.com/SB2IGnWzM7
— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) July 15, 2020