नाशिक : शिवसेनेचे नेते आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे यांची आज नाशिकमध्ये जाहीर सभा होत आहे. यावेळी बंडखोर आमदार सुहास कांदे हे आदित्य ठाकरे यांची भेट घेणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आज नाशिकमध्ये हायव्होल्ट्रेज ड्रामा बघायला मिळू शकतो. त्याआधी सुहास कांदे यांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप देखील केले आहेत.
“उद्धव ठाकरे आजारी पडलेत तेव्हाच शिंदेंनी मुख्यमंत्री होण्याची चाचपाणी सुरू केली”
शिवसेनेचे संपर्कप्रमुख जयंत दिंडे यांना फोन केला होता. मला आदित्य ठाकरे यांना भेटायचे आहे. असे मी त्यांना सांगितले. त्यांनी साहेबांशी बोलून कळवतो. असे सांगितलं. आता मी मनमाडच्या दिशेने निघालो आहे. आम्ही आदित्य ठाकरे यांना एक प्रश्न विचारायचा आहे. काल त्यांच्या भाषणावेळी हातामध्ये भगवा धागा दिसत नव्हता. त्यांच्या हातामधलं शिवबंधन कुठे गेलं?त्यांनी हे प्रतिक सोडलंय का? असा सवाल देखील त्यांनी केला आहे. दरम्यान, सुहास कांदे हे मनमाडच्या दिशेने जात असताना पिंपळगाव बंसवत येथील टोलनाक्यावर सुहास कांदेंच्या विरोधात शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी केली.
यंदा गणपती बाप्पा लवकरच पावला; यंदा सर्व सण निर्बंधमुक्त होणार; मुख्यमंत्री
एकनाथ शिंदे यांना नक्षलवाद्यांकडून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. त्यावेळी उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री होते. त्यावेळी एकनाथ शिंदे यांना का सुरक्षा देण्यात आली नाही, असा सवाल देखील सुहास कांदे यांनी केला आहे. हिंदुविरोधी वाद्यांना सुरक्षा दिली जाते परंतु हिंदुत्वासाठी लढणाऱ्याला सुरक्षा दिली जात नाही. याची खंत वाटते. असं देखील सुहास कांदे यांनी म्हटलं आहे.
“येणाऱ्या पंधरा दिवसात अख्खी शिवसेना आमच्यासोबत”; आढळराव पाटलांचा दावा
शंभुराजेंना वर्षा बंगल्यावरून फोन आला होता की एकनाथ शिंदे यांना सुरक्षा देऊ नका. का सुरक्षा दिली नाही. असा सवाल देखील त्यांनी केला. यावर काॅंग्रेसचे नेते सतेज पाटील यांनी या आरोपाचे खंडन केले आहे. सुरक्षा देण्यामागे गृहराज्यमंत्री घेत असतात तो निर्णय मुख्यमंत्री हे घेत नसतात. चिप सेक्रेटरीच्या खाली एक समिती असते. त्यावर ते अभ्यास करतात. मग सुरक्षा दिली जाते. तसेच एकनाथ शिंदे हे गडचिरोलीचे पालकमंत्री असल्याने त्यांना पोलीस खातं अधिक सुरक्षा देते यावर काही तथ्य नाही. असंही सतेज पाटलांनी म्हटलं आहे.
Read also
- नाशिकमध्ये हायव्होल्टेज ड्रामा होणार; सुहास कांदे, आदित्य ठाकरे येणार आमनसामने
- एक स्वयंशिस्त, रोखठोक गतिमान अन् दुसरा राज्याच्या राजकारणातील नव्या पर्वाचा जनक
- राष्ट्रवादीतून लांडे-पानसरे ‘बेदखल’; शिवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही दुफळी
- “तर लोकं तुम्हाला काय बोलतात ते ही ऐका “? केसरकरांचं आदित्य ठाकरेंना प्रत्युत्तर
- आदित्य ठाकरे पर्यावरण मंत्री होते मग सगळा अभ्यास त्यांनीच केला का?