मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकार स्थापनेनंतर शिवसेनेचे नेते पक्ष टिकवण्यासाठी पदाधिकाऱ्यांची, कार्यकर्त्यांची भेट घेत आहेत. युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे बंडखोर आमदारांच्या मतदारसंघात शिवसंवाद यात्रा करत आहेत. आज ते भिवंडीतील सभेत बोलत होते. यावेळी त्यांनी शिंदे सरकारवर हल्लाबोल केला.
“3 सदस्यांची प्रभाग रचना रद्द करून 4 सदस्यांची प्रभाग रचना करावी”; भाजपचे मुख्यमंत्र्यांना पत्र
उद्धव ठाकरे यांच्यावर आतापर्यंत एक नव्हे तर दोन शस्त्रक्रिया झाल्या आहेत. पण उद्धव ठाकरे हे शस्त्रक्रियेनंतर बेडवरून हलू शकत नव्हते, ही माहिती ज्या मिनिटाला एकनाथ शिंदे यांना समजली तेव्हापासुन त्यांना आपण मुख्यमंत्री होऊ शकतो का, याची चाचपणी सुरू केली. आपल्यासोबत कोण येईल किंवा नाही. यादृष्टीने आमदारांची जमवाजमव करायला सुरुवात केली. या गद्दाराची ही मानुसकी आहे, असं आदित्य ठाकरे म्हणाले.
“जर झगडे या आयोगात नसते तर यांनी ओबीसींची कत्तल केली असती”
गद्दारांची माणुसकी तर बघा, त्यांनी जमवाजमव कधी केली तर आपले मुख्यमंत्री रूग्णालयात होते. तेव्हा आपल्या मुख्यमंत्र्यांची आठवडाभरात एक नव्हे तर दोन ऑपरेशन्स झाली. त्यानंतर त्यांनी बेडवरुनही हलता येत नव्हते. बंडखोर आमदार आरोप करतात की मुख्यमंत्री आम्हाला भेटत नव्हते. ही गोष्ट खरी आहे. मुख्यमंत्री शस्त्रक्रियेनंतर दोन महिने कोणालाच भेटले नाहीत. पण ते फोनवरून सर्व काम करत होते, असंही आदित्य ठाकरे म्हणाले.
“बावनकुळे साहेब…आपण स्वप्नात राहू नका”; अमोल मिटकरींचा बावनकुळेंना टोला
आजचा उत्साह बघून एवढंच बोलतो, हेच खरं शिवसेनेच प्रेम आहे. गेल्या महिन्यापासुन दुःखदायक वातावरण आहे. हे विसरण्यासाठी शिवसंवाद यात्रा काढली आहे. शिवसैनिकांना भेटण्यासाठी ही यात्रा काढली आहे. ज्यांना आपण पुढं आणले, ओळख दिली. मंत्रीपद दिली. पण ते आपल्याला सोडून गेले. गद्दारी केली. हे तुम्हाला तरी पटणार आहे का? जे काही महाराष्ट्रात सुरु आहे ते राजकारण म्हणून तुम्हाला तरी पटणारं आहे का? असा सवाल आदित्या ठाकरे यांनी केला.
Read also
- यंदा गणपती बाप्पा लवकरच पावला; यंदा सर्व सण निर्बंधमुक्त होणार; मुख्यमंत्री
- “येणाऱ्या पंधरा दिवसात अख्खी शिवसेना आमच्यासोबत”; आढळराव पाटलांचा दावा
- द्रौपदी मुर्मू यांना विरोधी पक्षातील 99 खासदारांनी केलं मतदान; य़शवंत सिन्हा पिछाडीवर
- “सगळं संपल्यानंतरही शिवसेना नेत्याचा शिंदे ठाकरेंना एकत्र करण्यासाठी प्रयत्न”
- “शिंदेंना सेनेतुन मुख्यमंत्री होता आलं नाही, म्हणून त्यांनी भाजपशी जवळीक साधली”