मुंबई : पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे सेनेतील अनेक नेत्यांना पक्षातून हाकालपट्टी केली जात आहेत. हाकालपट्टी करण्यात आलेले नेते आता शिंदे गटात सामील होत असून याचा उद्धव ठाकरे यांचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. यातच आता शिवसेना नेत्या दिपाली सय्यद यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांना एकत्रित आणण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. यासंदर्भात त्यांनी एक ट्विट केलं आहे.
भाजपच्या 4 आमदारांची आर्थिक फसवणुक करणारा पोलिसांच्या ताब्यात
त्यात त्यांनी असं म्हटलं आहे की, अजूनही वेळ गेलेली नाही, आमदार खासदारांना शिवसेना पक्ष मागायला कोर्टात जाण्याची गरज लागणार नाही. उद्धव ठाकरे आणि शिंदे साहेबांनी चर्चा केली तर मार्ग निघेल, याची जबाबदारी दोन्ही बाजूने झाली तर विजय शिवसेनेचाच होईल, असं दिपाली सय्यद यांनी म्हटलं आहे. तसेच काल देखील त्यांनी यासंदर्भात म्हटलं होतं. दोन्ही बाजूंनी आमदार खासदारांनी प्रयत्न केले तर अशक्य काहीच नाही. वेळेच्या अगोदर आणि वेळेच्या नंतर काहीच नाही जे आहे, ते वेळेवर अजूनही वेळ गेलेली नाही, राग रूसवे विसरून कुटुंब वाचवा, चर्चा तर झालीच पाहिजे, असं म्हणत त्यांनी समजोता घडणयाचा प्रयत्न केला आहे.
“राऊतांना राष्ट्रवादीत जायचं आहे, त्यामुळे त्यांनी शिवसेना फोडली”; रामदास आठवलेंचं वक्तव्य
एकनाथ शिंदे यांच्या बंडाळीनंतर आता आदित्य ठाकरे मैदानात उतरले आहेत. त्यांची आज भिवंडी, इगतपुरी, नाशिक आणि दिंडोरी याठिकाणी सभा होणार आहेत. तर उद्धव ठाकरे देखील ऑगस्ट पासून महाराष्ट्राच्या दौऱ्यावर जाणार आहेत.
Read also
- “शिंदेंना सेनेतुन मुख्यमंत्री होता आलं नाही, म्हणून त्यांनी भाजपशी जवळीक साधली”
- “3 सदस्यांची प्रभाग रचना रद्द करून 4 सदस्यांची प्रभाग रचना करावी”; भाजपचे मुख्यमंत्र्यांना पत्र
- “जर झगडे या आयोगात नसते तर यांनी ओबीसींची कत्तल केली असती”
- “बावनकुळे साहेब…आपण स्वप्नात राहू नका”; अमोल मिटकरींचा बावनकुळेंना टोला
- “फडणवीस हे बालिशच आहेत, सत्तेसाठी आसुरलेले नेते”; राष्ट्रवादीचा फडणवीसांवर हल्लाबोल