मुंबई : विधानसभा अध्यक्षांची निवड करण्यासाठी नियम बदलावे लागणार आहेत, ही बैठक अध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली व्हावी लागते. पण अध्यक्षच नाहीत. तुमच्याकडे मेजॉरिटी आहे, मग घाबरताय का?” असा सवाल विधानसभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी विचारला आहे. “हात वर करुन का? घ्या मतदान, पाहूया ताकद. महाराष्ट्राच्या ६० वर्षांच्या काळात हे कधीही घडलं नव्हतं. यांचा ना एकमेकांवर विश्वास आहे, ना आमदारांवर” अशी टीकाही फडणवीसांनी केली. अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी नुकतीच देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत ओबीसी आरक्षणाबाबत चर्चा केली. त्यानंतर फडणवीस बोलत होते.
नाना पटोले यांच्या स्वबळाच्या घोषणेवर, अशोक चव्हाण म्हणतात….
इम्पेरिकल डाटा संबंधात छगन भुजबळ यांनी भेट घेतली. मराठा आरक्षणावेळी आम्ही डेटा कसा गोळा केला, हे मी त्यांना सांगितलं आणि सुप्रीम कोर्टाने तो कसा व्हॅलिड ठरवला, तेही सांगितलं. तुम्ही पुढाकार घ्यावा, एजन्सी नेमाव्या, मी पर्सनली नोट तयार करुन देईन, मी तुमच्या सोबत काम करेन, सत्तारुढ नेत्यांना नेतृत्त्व करावं लागतं. मी पूर्ण करेन, असं फडणवीसांनी सांगितलं. सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला आदेश दिले आहेत. आता निवडणुका पुढे ढकलल्या आहेत, पण फेब्रुवारीत मेजर निवडणुका येतील. त्यापूर्वी हे करणं आवश्यक आहे, असंही फडणवीस म्हणाले.
विधानसभा अध्यक्षांची निवड करण्यासाठी नियम बदलावे लागणार आहेत, ही बैठक अध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली व्हावी लागते. पण अध्यक्षच नाहीत. तुमच्याकडे मेजॉरिटी आहे, मग घाबरताय का? हात वर करुन का? घ्या मतदान, पाहूया ताकद. महाराष्ट्राच्या ६० वर्षांच्या काळात हे कधीही घडलं नव्हतं. यांचा ना एकमेकांवर विश्वास आहे, ना आमदारांवर, अशी टीकाही फडणवीसांनी केली.
राज्यमंत्री बच्चू कडू यांना नौटंकी करण्याची जुनीच सवय; रवी राणा यांची टीका
नाना पटोले बोलतात, मग पवार साहेब मत व्यक्त करतात, मग काही लोक नाना पटोलेंना न घेता पवारांना भेटतात. त्यातून सर्व काही कळतं, असा टोलाही फडणवीसांनी लगावला. पंकजा मुंडे यांचं भाषण ऐकण्याचा प्रश्न नाही, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी खुलासा केला आहे, त्यावर मी बोलण्यात अर्थ नाही, असंही फडणवीस म्हणाले.
Read Also :
- आरक्षणाचे नेतृत्व तुम्ही करा, मी सपोर्ट करतो; फडणवीसांची भुजबळांना राजकीय साद
- विधानसभा अध्यक्षपद निवडणुकीसाठी खलबतं; महाविकास आघाडी थेट नियमच बदलणार!
- छगन भुजबळ देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला; कोण करणार ओबीसींचे नेतृत्व?
- संजय राठोड यांना पुन्हा मंत्रिमंडळात सामील केल्यास, मुख्यमंत्र्यांना घेराव घालणार’; उमा खापरेंचा इशारा
- ठाकरे सरकारने घेतलेले मंत्रिमंडळ बैठकीतील महत्त्वाचे निर्णय, थोडक्यात.