मुंबई : विधानसभा अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत महाविकास आघाडी सावध पवित्रा घेताना दिसत आहे. विरोधकांकडून कोणताही दगाफटका होऊ नये, म्हणून आवाजी पद्धतीने मतदान घेण्यासाठी हालचाली सुरु झाल्या आहेत. राज्य विधिमंडळाच्या नियमानुसार विधानसभा अध्यक्षांची निवड करण्यासाठी गुप्त पद्धतीने मतदान घेण्यात येते. मात्र ही निवडणूक आवाजी पद्धतीने घेण्यासाठी नियमांमध्ये बदल करण्यात येणार आहेत.
पुणे मेट्रोच्या श्रेयासाठी भाजप आणि राष्ट्रवादी आमने – सामने; कोण करणार उद्घाटन?
तशा प्रकारचा प्रस्ताव विधिमंडळ नियम समितीमध्ये पारित झाला आहे. प्रस्ताव सभागृहाच्या पटलावर ठेवण्यात येणार असून या संदर्भात ड्राफ्ट तयार करण्याचे काम सुरु आहे. या समितीमध्ये राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना आणि भाजप या चारही प्रमुख पक्षांचे प्रत्येकी दोन सदस्य आहेत.
आगामी महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून २३ गावांचा घाट घातला; महापौर मुरली मोहोळांचा घणाघात
विधानसभा अध्यक्षपद निवडणूक पावसाळी अधिवेशनातच घ्यावी अशी मागणी काँग्रेसने लावून धरली होती. तसंच भाजपकडूनही विधानसभा अध्यक्षपदासाठी निवडणूक घेण्याची मागणी होत होती. मात्र परिस्थिती निवळल्यानंतर विधानसभा अध्यक्षांची निवडणूक घेऊ, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे विधानसभा अध्यक्षपद निवडणुकीसाठी विशेष अधिवेशन बोलावलं जाण्याची चिन्हं आहेत.
नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यानंतर या खुर्चीवर कोण विराजमान होणार? पुढचा विधानसभा अध्यक्ष काँग्रेसचाच असणार का? असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. विधानसभा अध्यक्षपदासाठी काँग्रेसकडून अनुभवी नेते पृथ्वीराज चव्हाण, ऊर्जामंत्री नितीन राऊत, मराठवाड्यातील काँग्रेस नेते सुरेश वरपुडकर, मंत्रिपद न मिळाल्यानं नाराज असलेले आमदार संग्राम थोपटे आणि आदिवासी विकासमंत्री के. सी. पाडवी यांच्या नावांची चर्चा सुरु आहे.
Read Also :
- छगन भुजबळ देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला; कोण करणार ओबीसींचे नेतृत्व?
- संजय राठोड यांना पुन्हा मंत्रिमंडळात सामील केल्यास, मुख्यमंत्र्यांना घेराव घालणार’; उमा खापरेंचा इशारा
- ठाकरे सरकारने घेतलेले मंत्रिमंडळ बैठकीतील महत्त्वाचे निर्णय, थोडक्यात.
- ‘‘स्वबळाची तयारी सुरु केली आहे कारण…” नाना पटोलेंनी केला मोठा खुलासा!
- “मुख्यमंत्र्यांनी शिक्षणाचा खेळ मांडून गुणवत्ता संपविण्याचा घाट घातला आहे”