मुंबई : भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी, भाजप प्रदेश कार्यालयात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना, ठाकरे सरकारच्या शिक्षण विषयक धोरणांवर जोरदार हल्लाबोल केला असून, “उच्च न्यायालयाने या सरकारच्या शैक्षणिक धोरणांविषयी कानउघडणी करूनही, त्यांनी त्याकडे कानाडोळा केला. त्यामुळे, हे सरकार विद्यार्थ्यांच्या भविष्याचा खेळ मांडून, त्यांची शैक्षणिक गुणवत्ता संपविण्याचा घाट घातला आहे,” असा आरोप केला आहे.
तसेच, “शाळा कधी आणि कशाप्रकारे सुरू करणार, खासगी शाळांकडून केली जाणारी अवाजवी शुल्क आकारणी, अभ्यासक्रमातील घोळ, १०-१२वीच्या विद्यार्थ्यांचे मुल्यांकन, अशा कोणत्याही मुद्द्यांवर या सरकारचे धोरण स्पष्ट नाही. त्यामुळे, मुख्यमंत्र्यांना शिक्षण विषयाचे गांभीर्य आहे की नाही?,” असा गंभीर सवाल करत, “या सरकारने तातडीने शुल्क निश्चिती करून शाळांना चाप लावावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
मुख्य प्रवक्ते श्री. केशव उपाध्ये यांची पत्रकार परिषद. https://t.co/LYjvazd4Id
— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) July 14, 2021
‘राईट टू एज्युकेशन’ नुसार शैक्षणिक संस्थांमध्ये दिले जाणारे प्रवेशही अनेक शाळांनी नाकारले असून, विद्यार्थ्यांच्या शुल्काचा परतावा दिला नसल्याने राज्य सरकारने प्रवेश नाकारले आहेत, असं शिक्षण संस्थांनी स्पष्ट केलं आहे. ‘सीबीएसई’ सारखी मुल्यांकनाची स्वत:ची प्रणाली, आपल्या शिक्षण मंडळांनी अजून का तयार केली नाही, या सगळ्या दिरंगाईचा आणि गोंधळाचा फटका विद्यार्थ्यांना बसतोय. त्यामुळे, विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी सरकारने खेळू नये, अशी टीकाही त्यांनी केली आहे.
Read Also :
- “पंकजा मुंडे समजूतदार, त्या कधीच बंडाचा विचार करणार नाहीत”- चंद्रकांत पाटील
- “तुम्ही आम्हाला जेवायला बोलवा, आम्ही स्वबळावर जेवायला येऊ”, मुख्यमंत्र्यांचे काँग्रेसला चिमटे
- सूत्र : प्रशांत किशोर यांचं वक्तव्य, शरद पवार हे विरोधी पक्षाचे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार!
- कुणाच्याही नेतृत्वात लढा, भाजप ४०० पेक्षा अधिक जागा जिंकणारच – चंद्रकांत पाटील
- “महाराष्ट्र हे काँग्रेसचंच राज्य आहे, २०२४ मध्ये काँग्रेसच नंबर एकची पार्टी”