मुंबई : गेल्या काही दिवसांपासून मराठवाड्याला मुसळधार पावसानं झोपडून काढलं आहे. त्यामुळं काढणीस आलेले सोयाबीनचे पीक धोक्यात आले आहे. सततच्या मुसळधार पावसामुळे सोयाबीनला कोंब फुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. निसर्गाचा लहरीपणा, लागवड खर्चात भरमसाठ वाढ आणि बाजारात गडगडलेले सोयाबीनचे दर यामुळे पुन्हा एकदा शेतकरी हवालदिल झाला आहे.
किरीट सोमय्यांना रोखण्यासाठी ठाकरे सरकारचा ‘मास्टरप्लॅन’; भाजपच्या मुसक्या आवळणार?
त्यातच आता केंद्र सरकारने बारा लाख टन सोयामिलची आयात करण्याचा निर्णय घेतल्याने त्याचा परिणाम सोयाबिनच्या भावावर होम्याची शक्यता आहे. राज्यातील शेतकऱ्यांचे सोयाबीन आणि आयात करण्यात आलेले सोयामील एकाच वेळी बाजारात पोहचणार असल्यानं सोयाबीनचे दर घसरण्याची शक्यता आहे. मोदी सरकारच्या याच धोरणावरून काँग्रेसनं केंद्रातील या निर्णयावर जोरदार टीका केली आहे. राज्यातील बहुतांश जिल्ह्यात सोयाबीनच्या दरात घसरण झाली आहे. सोयाबीन बाजारात दाखल होण्याची वेळ आली असतानाच भाव घसरल्याचा आरोप शेतकरी वर्गाकडून होत आहे. यावरुन काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी ट्वीट करत केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. तसंच, देवेंद्र फडणवीस यांनीही या ट्वीटमध्ये टॅग केलं आहे.
सोयाबीन चे भाव सातत्याने पडत आहेत याचे कारण म्हणजे केंद्र सरकारने १२ लाख टन सोयामील आयात करण्याचा निर्णय घेतला आहे. डाळींबाबतही मोझांबिक सारख्या देशांना फायदा व्हावा याकरिता मोदी सरकारने करार केला होता. शेतकरी उद्ध्वस्त झाला पाहिजे हेच मोदी सरकारचे धोरण आहे. https://t.co/Nhpx4mQ89A
— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) September 24, 2021
‘सोयाबीनचे भाव सातत्याने पडत आहेत. याचे कारण म्हणजे केंद्र सरकारने १२ लाख टन सोयामील आयात करण्याचा निर्णय घेतला आहे. डाळींबाबतही मोझांबिकसारख्या देशांना फायदा व्हावा याकरिता मोदी सरकारने करार केला होता. शेतकरी उद्ध्वस्त झाला पाहिजे हेच मोदी सरकारचे धोरण आहे,’ अशी टीका सचिन सावंत यांनी केली आहे. ‘एकेकाळी शेतकरी दिंडी काढून चिपळ्या वाजवत शेतकऱ्यांची कणव आहे असे दाखवून सोयाबीनला भाव मागणारे देवेंद्र फडणवीसजी मोदी सरकारचा निषेध करणार का? सोयामील आयातीचा निर्णय थांबवण्यास मोदींना भाग पाडणार का?,’ असा सवाल सचिन सावंत यांनी उपस्थित केला आहे.
Read Also :
- लोकांच्या सहनशिलतेचा अंत पाहू नका; अजित पवारांनी कंत्राटदारांना भरला दम
- अजितदादा, मुख्यमंत्र्यांसोबत प्रस्ताव बनवा, मी नरीमन पॉईंट दिल्लीला जोडतो – नितीन गडकरी
- छगन भुजबळांनी नियोजन समितीचा निधी विकला; 500 पुरावे घेवून शिवसेना आमदाराची कोर्टात धाव
- ‘तुमची धोतरं पेटतील’ म्हणणाऱ्या शिवसेनेचं राज्यपालासमोर लोटांगण: 24 तासातच राऊतांनी मारली पलटी
- ५ वर्ष नाही, हजार वर्षे तुम्ही सत्ता राखा, पण राज्यातील महिला…- सुधीर मुनगंटीवार आक्रमक