नवी दिल्ली : सध्या देशात मोठ्या प्रमाणात बेरोजगारी वाढलेली असताना मोदी सरकारने यावर उपाय शोधन गरजेचे आहे. तरुणांना फार काळ फेक न्यूज मध्ये अडकून ठेऊ शकणार नाही, जेव्हा तरुणाई बेरोजगारीच्या प्रश्नावरून रस्त्यावर उतरून आंदोलन करतील तेव्हाच तुम्हाला जाग येणार आहे का? असा सवाल उपस्थित करत माजी आरबीआय गव्हर्नर डॉ. रघुराम राजन यांनी मोदी सरकारवर ताशरे ओढले आहेत.
खोट्या बातम्या आणि सोशल मीडियाद्वारे देशातील तरुणांचे लक्ष फारकाळ विचलित करता येणार नाही किंवा त्यांना फारकाळ गुंतवूणही ठेवता येणार नाही. देशात वेळीच रोजगार निर्मिती झाली नाही तर देशातील तरुण रस्त्यावर उतरुन आंदोलने करतील, असा इशारा भारतीय रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी मोदी सरकारला दिला आहे. भवन्स एस. पी. जैन इन्सिट्यूट ऑफ मॅनेजमेंट आणि रिसर्चच्या सेंटर फॉर फायनान्शियल स्टडीजच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेल्या वेबिनारमध्ये राजन यांनी हा इशारा दिला आहे.
देशातील तरुणांना रोजगार हवा आहे. रोजगारासारख्या मूळ मुद्यावरुन त्यांचे लक्ष विचलित करण्यासाठी खोट्या बातम्या आणि सोशल नेटवर्किंगचा वापर मर्यादित काळाकरिता करता येईल. परंतु ते फारकाळ प्रभावी ठरणार नाही. देशात वेळीच रोजगार निर्मिती झाली नाही तर हे तरुण रस्त्यावर उतरुन आंदोलने करतील, असे राजन म्हणाले.
जीडीपीच्या ५० टक्के क्रेडिट अशी आपली भयंकर परिस्थिती आहे.आपण क्वालिटी आणि क्वांटीटी अशा दोन्ही बाबतीत मार खात आहोत. त्यामुळे देशाची आर्थिक घडी नीट बसवण्यासाठी काम करणे गरजेचे आहे. असेम्बली मार्केटचा विस्तार हे चीनच्या निर्यातीत वाढ होण्याचे आणि प्रगतीचे मुख्य कारण आहे. तसे वातावरण आपल्या इथे निर्माण करण्याची गरज आहे, असेही राजन म्हणाले.
Read Also :
उद्धव ठाकरेंनी बेईमानी करून मुख्यमंत्री पद मिळवले, नारायण राणेंची टीकाhttps://t.co/hmQOhIn5ZX @MeNarayanRane @CMOMaharashtra @OfficeofUT
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) October 26, 2020