रत्नागिरी : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी भाजपचे खासदार नारायण राणे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. मराठा आरक्षणासाठी नेमलेल्या नारायण राणे समितीने काय दिले लावले हे सर्वांनाच माहीत आहे, असं सांगतानाच मराठा आरक्षणाचा अहवाल एका अडाणी माणसाच्या हातून दिला गेला याचंच आश्चर्य वाटतं, अशा शेलक्या शब्दात विनायक राऊत यांनी राणेंवर टीका केली आहे.
विनायक राऊत यांनी मीडियाशी संवाद साधताना नारायण राणे यांच्यावर शेलक्या शब्दात टीका केली. मराठा आरक्षणाच्या अभ्यासासाठी नेमलेल्या नारायण राणे समितीने काय दिवे लावले? राणे समितीने मराठा आरक्षणाचा सत्यानाश केला. मराठा आरक्षणाच्या समितीचा अहवाल एका अडाणी माणसाच्या हाती दिला गेला याचंच आश्चर्य वाटलं, असे चिमटे राऊत यांनी काढले. मराठा आरक्षणावर चर्चा करण्यासाठी आम्हाला पंतप्रधानांनी वेळ दिला नाही. आम्ही दोन वेळा मागितली होती, पण पंतप्रधानांनी आम्हाला वेळ दिली नाही. महाविकास आघाडीला मराठा आरक्षणाचे श्रेय जावू नये म्हणून केंद्र सरकारला टोलवाटोलवी करायची होती. श्रेयवादाचा मुद्दा केंद्र सरकारने जाणूनबुजून उभा केला आहे, असा आरोप त्यांनी केला. मराठा आरणक्षावर महाविकास आघाडी पुनर्विचार याचिका दाखल करण्यासंदर्भात विचार करत असल्याची माहितीही त्यांनी दिली.
खासदार संभाजी छत्रपती आणि नारायण राणेंची तुलना होवू शकत नाही. संभाजीराजेंनी मला दे, मला दे असं भांडून खासदारकी मिळवली नाही. त्यांना दिलेली खासदरकी हा बहुमान आहे. मात्र राणेंची सोशल मीडियावरून केवळ प्रसिद्धीसाठी टिवटिव सुरू आहे, अशी खोचक टीकाही त्यांनी केली. मराठा आंदोलन करणारे नेते मराठा आरक्षण प्रश्न चिघळवण्याचे काम करत आहेत. संभाजी राजेंची संयमाची भूमिका योग्यच आणि कौतुकास्पद आहे, असंही ते म्हणाले.
Read Also :
- आगामी महापालिका निवडणूकीत शिवसेना ८० जागा लढवणार – संजय राऊतांची घोषणा
- ५ जुलैपर्यंत मागण्या मान्य करा, अन्यथा पावसाळी अधिवेशन होऊ देणार नाही
- बीडच्या मोर्च्याला जाणाऱ्या कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड
- केंद्राने लसीकरणासंदर्भात देशाचा एक चार्ट बनवून जनतेसमोर ठेवावा – नवाब मलिक
- राष्ट्रवादीच्या नेत्यांवर आम्ही खापर फोडले नाही; संजय राऊतांचा यु-टर्न