म्हापसा : गोवा निवडणूक जसजशी जवळ येवू लागली आहे तसतसा प्रचारा बार उडू लागला आहे. १४ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या गोव्यातील विधानसभा निवडणूक मतदानासाठी सर्वपक्षीय नेते मैदानात पाय घट्ट रोवून उभे आहेत. त्यातच भोसरीचे आमदार तथा पिंपरी चिंचवड शहराचे अध्यक्ष महेश लांडगे यांनी गोव्याचे प्रभारी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत निवडणूक प्रचारासाठी शक्ती केंद्र प्रमुखांसोबत जोर बैठकांचा धडाका लावला आहे. यावेळी सोबत आमदार राम सातपुते उपस्थित होते.
राज्यात लवकरच होणार दुसऱ्या टप्प्यातील पोलीस भरती; गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांची घोषणा
भाजपचे निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस यांनी गोव्याच्या प्रचार मोहिमेत महाराष्ट्रातील अनेक आमदारांना उरविले आहे. त्यामध्ये प्रामुख्याने भोसरीचे आमदार महेश लांडगे तसेच आमदार राम सातपुते यांचा समावेश आहे. दुसऱ्या बाजुला काँग्रेसचे प्रभारी दिनेश गुंडू राव यांनी कर्नाटकातील काँग्रेसचे नेते गोव्यात पाठवले आहेत. परंतू, गोव्यातून फडणवीसांच्या नावाला आग्रह झाला. कारण त्यांचे व्यक्तिमत्व अनेकांना आवडते. त्यातच आमदार महेश लांडगे यांनी शक्ती केंद्रावर चंग चंग पछाडून काढण्यास सुरूवात केल्याने भाजपला मोठे पाठबळ मिळाले आहे.
नथुराम गोडसेंची भूमिका; राष्ट्रवादीच्या प्रचारातील ‘ सेलिब्रेटी’ चेहरा बॅकफूटवर !
दरम्यान, निवडणूक आयोगाने जाहीर सभांना कोरोनामुळे बंदी घातली आहे. यामुळेच बहुतांश उमेदवार हे मतदारांच्या गाठीभेटी घेत असल्याचे दिसून येत आहे. म्हपश्यातील भाजपचे उमेदवार जोशुआ डिसुझा हे देखील मतदारांच्या गाठीभेटी घेत आहेत. त्यातच काल म्हापसा मतदार संघातील उमेदवार जोशुआ डिसुझा यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन गोवा भाजपा प्रभारी देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झाले. या कार्यक्रमाला सदानंद तानावडे, भोसरीचे आमदार महेश लांडगे, आमदार राम सातपुते, माजी मंत्री दयानंद मांजरेकर, भाजप नेते अभिजित सामंत, नगराध्यक्ष शुभांगी वायंगणकर, मंडळ अध्यक्ष सुशांत हरमलकर आदी उपस्थित होते. त्यानंतर आमदार लांडगे यांनी फडणवीसांना घेवून प्रचाराचा मोर्चा शक्ती केंद्राकडे वळवला.
‘जी परंपरा बाबुश यांनी सुरू केली ती परंपरा पुढे नेण्याचे काम जोशुआ निश्चितपणे करतील’
गोव्यातील मतदानाला अजून १५ दिवस बाकी आहेत. एकीकडे भाजपणे जोरदार प्रचार सुरू केला असताना दुसरीकडे काँग्रेस पक्षात सध्या काय चाललयं? हे नेमकं त्यांनाच कळत नाहीत. काँग्रेस नेते निवडणूकीआधीच विजयाच्या उन्मादात असल्याचे दिसून येते. अजून मतदाराला १५ दिवस बाकी असले तरी मतदारांचा कल ठरलेला नाही. काँग्रेसच्या प्रचारसभाही सुरू झालेल्या नाहीत. उलट भाजपचे नेते राज्याचा दौरा करू लागली आहेत. काँग्रेसच्या नेत्यांचा पत्ता नाही. तरीही त्यांना वाटते की १० वर्षानंतर भाजपला प्रस्थापित विरोधी लाटेचा फटका बसणार आहे. त्यामुळे, १४ फेब्रुवारीचा कौल कुणाच्या पारड्यात जड भरतो, हे पहाणे महत्वाचे ठरणार आहे.
Read also:
- आमदारांचे असंवैधानिक निलंबन: सर्वोच्च न्यायालयाची महाविकास आघाडी सरकारला चपराक!
- राज्यातील विरोधी पक्ष देशी पिउन बरळतोय; वाईन विक्री निर्णयावरून संजय राऊतांची भाजपवर टीका
- शास्तीकराचा गुंता राष्ट्रवादीने वाढवाला अन् पिंपरी-चिंचवडकरांच्या जखमेवर आता मीठ चोळले?
- ज्या उमेदवाराचा रिमोट कंट्रोल कलंगुटमध्ये आहे अशा उमेदवाराला निवडून देणार का? फडणवीसांचा हल्लाबोल
- मनोहर पर्रीकर आणि फ्रान्सिस डिसूजा यांची जोडी राम लक्ष्मणासारखी होती – फडणवीस