मुंबई : राज्यात गेल्या दोन ते तीन दिवसांपासून सुपरमार्केटमध्ये वाईन विक्रीच्या निर्णयावरुन महाविकास आघाडी सरकारवर विरोधी पक्षासहित सामाजिक इतर घटकांनीही टीकेची झोड उठवली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली हा निर्णय घेण्यात आला होता. हे महाविकास आघाडी सरकार नसून महा ‘मद्यपी’ सरकार वगैरे वगैरे अशी टीका भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांकडून करण्यात आली आहे. या टीकेला आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी उत्तर दिले आहे.
मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे प्रमुख राज ठाकरेंची जोरदार मोर्चेबांधणी
सामनाच्या अग्रलेखात संजय राऊत यांनी भाजपवर टीका करताना म्हटलं आहे की, वाईन आणि दारू यातला फरक विरोधी पक्षाला चांगलाच माहिती आहे. मात्र महाराष्ट्रातल्या विरोधी पक्ष असणाऱ्या भाजपला वाईन चढली आहे व ते सरकारच्या विरोधात बोंब मारीत आहेत. सुपरमार्केटमध्ये वाईन विक्रीची मुभा दिल्याने राज्यातील भाजप देशी नवसारीची दारू प्यायल्याप्रमाणे बरळू लागला आहे, अशी खरमरीत टीका संजय राऊत यांनी सामना अग्रलेखातून केली आहे.
राज्यात लवकरच होणार दुसऱ्या टप्प्यातील पोलीस भरती; गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांची घोषणा
मोदी सरकारनेच नाशिक या वाईन कॅपिटलला विशेष दर्जा दिला आहे. केंद्र सरकार वाईन उद्योगाला बूस्ट करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यासाठी अनेक योजना केंद्रानं आखल्या आहेत. नाशिकच्या वाईनचं ब्रँडिंग करण्यासाठी केंद्र सरकार मदत करत आहे. नाशिक जिल्ह्यामध्ये वाईन टुरिझमला प्राधान्य मिळावे ही केंद्राची योजना आहे. मग आता केंद्र सरकारला हिंदुस्थानचेच मद्यराष्ट्र करायचे आहे असे महाराष्ट्रातील भाजपावाले बोंबलणार आहेत का? असा सवाल देखील संजय राऊत यांनी केला आहे.
Read also:
- शास्तीकराचा गुंता राष्ट्रवादीने वाढवाला अन् पिंपरी-चिंचवडकरांच्या जखमेवर आता मीठ चोळले?
- ज्या उमेदवाराचा रिमोट कंट्रोल कलंगुटमध्ये आहे अशा उमेदवाराला निवडून देणार का? फडणवीसांचा हल्लाबोल
- मनोहर पर्रीकर आणि फ्रान्सिस डिसूजा यांची जोडी राम लक्ष्मणासारखी होती – फडणवीस
- ‘जी परंपरा बाबुश यांनी सुरू केली ती परंपरा पुढे नेण्याचे काम जोशुआ निश्चितपणे करतील’
- नथुराम गोडसेंची भूमिका; राष्ट्रवादीच्या प्रचारातील ‘ सेलिब्रेटी’ चेहरा बॅकफूटवर !