मुंबई : महाराष्ट्रात आगामी काळात मुख्य समजल्या जाणाऱ्या महानगरपालिकांच्या निवडणुकांचा बार उडणार आहे. मुंबई, पुणे, पिंपरीचिंचवड, नाशिक, औरंगाबाद या महानगरपालिकांच्या निवडणुका आता तोंडावर आल्या आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाने यावेळी पूर्ण तयारीनिशी मैदानात उतरणायचे संकेत दिले आहेत.
यांना काय कळतं शेतीतलं? चंद्रकांत पाटलांनी पुन्हा संजय राऊतांना डिवचलं
गामी मुंबई आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे प्रमुख राज ठाकरेंनी एमआयजी क्लब येथे शुक्रवारी महत्त्वपूर्ण बैठक घेतली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या बैठकीत आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रणनिती ठरविण्यात आली आहे.
न्यायालयाचे दिलासे एकाचा राजकीय पक्षाला कसे मिळतात? शिवसेना नेते संजय राऊतांचा सवाल
मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत जास्तीत जास्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नगरसेवक निवडून यावेत यासाठी राज ठाकरेंनी मोठा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे. या बैठकीत पक्षातील नेते, सरचिटणीस आणि शहराध्यक्ष हजर होते. लवकरच आणखी एक महत्वाची बैठक मनसे पदाधिकाऱ्यांची होणार आहे असं देखील या बैठकीत सांगण्यात आलं आहे. काही दिवसांनी पुन्हा एक बैठक आयोजित करून लगेच मुंबईत मनसे प्रमुख राज ठाकरे मोठी सभा घेऊन निवडणुकीचे रणशिंग फुंकणार असल्याची माहिती पुढे आली आहे.
किराणा दुकानात वाईन विकण्यास परवानगी; संभाजी भिडे म्हणतात… अफ्फू-गांजाच्या शेतीला…
तसेच येत्या काळात विभागवार बैठका घेण्याचे आदेश त्यांनी दिल्याची माहिती पुढे आली आहे.राज्यातील आगामी महापालिकांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेने आतापासूनच जोरदार तयारी करत आहे. विशेष म्हणजे राज ठाकरे यांनी याआधीच मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. त्यासाठी मध्यंतरी राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र दौऱ्याचे नियोजन देखील करण्यात आले होते.
Read also:
- ‘जी परंपरा बाबुश यांनी सुरू केली ती परंपरा पुढे नेण्याचे काम जोशुआ निश्चितपणे करतील’
- नथुराम गोडसेंची भूमिका; राष्ट्रवादीच्या प्रचारातील ‘ सेलिब्रेटी’ चेहरा बॅकफूटवर !
- राज्यात लवकरच होणार दुसऱ्या टप्प्यातील पोलीस भरती; गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांची घोषणा
- पुण्यातील शाळा १ फेब्रुवारीपासून सुरू होणार; अजित पवारांची मोठी घोषणा
- महाविकास आघाडी सरकारला आता जनताच निलंबित करणार; माजी मंत्री सदाभाऊ खोत यांचा इशारा