मुंबई : मागील दोन वर्षांपासून राज्यात महाविकास आघाडीचे सरकार अस्तित्वात आहे. कोरोनाच्या महामारीमुळे गेल्या अनेक दिवसांपासून राज्यातील मुख्य भरत्या स्थगित झाल्या होत्या. मात्र आता गृहमंत्री दिलीपराव वळसे पाटलांनी पोलीस भरतीच्या बाबत महत्वाची घोषणा केली आहे.
एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला नक्षलवाद्यांचा पाठींबा; गोंदियात झळकले बॅनर-पत्रकं
दुसऱ्या टप्प्यात ७२०० पोलिसांची भरतीची प्रक्रिया पुढील महिन्यात सुरू केली जाणार असल्याचे वळसे-पाटलांनी पत्रकार परिषदेत सांगितले आहे. राज्यात याआधीच पहिल्या टप्प्यातील भरती प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. ५७०० पोलिसांची पहिल्या टप्प्यातील भरती प्रक्रिया पूर्णत्वास नेण्यास आली आहे.
जामीन नाकारला हा झटका नसून तो दिलासा आहे – निलेश राणे
याबरोबरच राज्यातील पोलीस ठाण्यांच्या अत्याधुनिकीकरणासाठी राज्य सरकारकडे निधी मागितला जाणार असल्याची माहिती दिलीप वळसे पाटील यांनी अहमदनगर येथे झालेल्या जिल्हा पोलीस दलाची आढावा बैठकीत सांगितले आहे. यावेळी आमदार संग्राम जगताप, नाशिक विभागाचे पोलिस महानिरीक्षक बी. जी. शेखर, जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांच्यासह पोलीस अधिकारी व पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. गृहमंत्री वळसे पाटलांच्या हस्ते ‘ई-टपाल’ सेवासुविधा, स्वागत कक्षाचे उद्घाटन करण्यात आले.
कोरोनासोबत जगण्यासाठी नवीन नियमावली बनवायला हवी – आरोग्य मंत्री राजेश टोपे
गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले की, राज्यात मार्चनंतर मोठ्या प्रमाणावर पोलिसांसाठी घरे उभारणीचा कार्यक्रम हाती घेतला जाणार आहे. पोलीस ठाण्यांच्या अत्याधुनिकीकरणासंदर्भात आपल्याकडे माहिती संकलित झाली आहे. त्यानुसार राज्य सरकारकडे निधी मागितला जाणार आहे अशी माहिती देखील गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली आहे.
Read also:
- पुण्यातील शाळा १ फेब्रुवारीपासून सुरू होणार; अजित पवारांची मोठी घोषणा
- महाविकास आघाडी सरकारला आता जनताच निलंबित करणार; माजी मंत्री सदाभाऊ खोत यांचा इशारा
- किराणा दुकानात वाईन विकण्यास परवानगी; संभाजी भिडे म्हणतात… अफ्फू-गांजाच्या शेतीला…
- न्यायालयाचे दिलासे एकाचा राजकीय पक्षाला कसे मिळतात? शिवसेना नेते संजय राऊतांचा सवाल
- यांना काय कळतं शेतीतलं? चंद्रकांत पाटलांनी पुन्हा संजय राऊतांना डिवचलं