मुंबई : राज्यात सध्या महाविकास आघाडी सरकार कार्यरत आहे. भारतीय जनता पक्षाशी काडीमोड केल्यानंतर शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी चांगलाच सलोखा जमवून घेतला आहे. यामुळे शिवसेना आणि भाजप असा संघर्ष वेळोवेळी पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार हे कायद्याने चालत नाही. ते अरेरावी आणि हुकूमशाही पद्धतीने चालत असल्याची प्रचिती हिवाळी अधिवेशनादरम्यान दिसून आली आहे. चुकीच्या पध्दतीने आमदारांचे निलंबन करून सरकार त्या मतदारसंघातील जनतेचा अपमान केला होता.
आज लोकशाहीचे संरक्षण झाले, १२ आमदारांबद्दलचा निर्णय लोकशाही वाचविणारा – देवेंद्र फडणवीस
या महाविकास आघाडी सरकारला राज्यातील कायदा पायदळी तुडवायचा आहे. हुकूमशाही पद्धतीने, ठोकशाही पद्धतीने या राज्याचा कारभार चालवायचा आहे. मात्र सर्वसामान्य जनता या सरकारला निलंबित केल्याशिवाय राहणार नाही असा संतप्त इशारा माजी राज्यमंत्री व रयत क्रांती संघटनेचे संस्थापक आमदार सदाभाऊ खोत यांनी दिला आहे.
मालाडमधील ‘या’ रस्त्याला दिले टिपू सुलतानाचे नाव; भाजप आमदाराने पाठींबा दिल्यामुळे पक्ष पडला तोंडावर
महाविकास आघाडी सरकारने सभागृहात भारतीय जनता पक्षाच्या १२ आमदारांचे केलेले निलंबन होते आणि हे निलंबन कायद्याला धरून नाही , असं वर्षभरासाठी आमदारांचं निलंबन करता येणार नाही, असा निकाल सर्वोच्च न्यायालयानं दिला आहे. या निर्णयाचं स्वागत माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी केलं आहे.
केंद्र सरकारकडे ६२५ करोड रुपये पडून आहेत; राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांचा आरोप
लोकांनी लोकप्रतिनिधी म्हणून जनतेच्या सेवेसाठी, मतदार संघाच्या विकासासाठी मतदान करुन आमदारांना(लोकप्रतिनिधींना) निवडुन दिलेलं आहे, परंतु चुकीच्या पद्धतीने या लोकप्रतिनिधींचे निलंबन करून महाविकास आघाडी सरकार त्या मतदारसंघातील जनतेचा अपमान करत आहे. अश्या वेगवेगळ्या प्रकरणामध्ये हे महाविकास आघाडी सरकार तोंडघशी पडतं आहे असा टोला देखील सदाभाऊ खोत यांनी मारला आहे.
Read also:
- किराणा दुकानात वाईन विकण्यास परवानगी; संभाजी भिडे म्हणतात… अफ्फू-गांजाच्या शेतीला…
- न्यायालयाचे दिलासे एकाचा राजकीय पक्षाला कसे मिळतात? शिवसेना नेते संजय राऊतांचा सवाल
- यांना काय कळतं शेतीतलं? चंद्रकांत पाटलांनी पुन्हा संजय राऊतांना डिवचलं
- कोरोनासोबत जगण्यासाठी नवीन नियमावली बनवायला हवी – आरोग्य मंत्री राजेश टोपे
- जामीन नाकारला हा झटका नसून तो दिलासा आहे – निलेश राणे