बीड : खासदार संभाजी छत्रपती यांनी अखेर रविवारी रायगडावरून मराठा आरक्षणासाठीच्या आंदोलनाची घोषणा केली आहे. येत्या १६ जून रोजी मराठा आरक्षणासाठी पहिला मोर्चा काढण्यात येणार आहे. कोल्हापूरमध्ये छत्रपती शाहू महाराजांच्या समाधीस्थळावरून हा मोर्चा काढण्यात येणार असल्याच्या घोषणेनंतर , “संभाजीराजे आता आमच्याच मागं येताय ना?”, अशी टीका विनायक मेटे यांनी मराठा आंदोलनाच्या घोषणेनंतर संभाजीराजेंवर केली आहे.
३४८ व्या शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या निमित्ताने रायगडावर भव्य सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी संभाजी छत्रपती यांनी आंदोलनाची घोषणा केली. लोकं नाराज झाले तरी चालतील. पण मी समाजाला वेठीस धरणार नाही. दिशाभूल करणं आमच्या रक्तात नाही. शिवभक्तांचा मला पाठिंबा आहे. तर काही शिवभक्त माझ्यावर नाराज आहेत. पण कोरोनाचं संकट असल्याने काहीच करता येत नाही. माझं काही चुकलं असेल तर मी दिलगीरी व्यक्त करत आहे.
विनायक मेटे म्हणाले की, आम्ही कोण काय म्हणत यांला कधिच महत्व देत नाही. खरतर आम्ही मराठा समाज, त्यांच्या सुखसोईल तसेच मराठा हिताच्या गोष्टीला जास्त महत्व देत आहे. मराठा समाजाची दिशाभूल करणारेच लोक आता समोर येत आहेत, तेच लोक आता मोर्चा काढणार असल्याचे जाहिर करत आहे. जे लोक जनेतची मराठा समाजाची दिशाभूल करणारचे लोक मोर्चाची तारखी जाहीर करत आहे, आमचं अनूकरण करत आहेत. आता मराठा समाजच ठरवले की कोण दिशाभूल करत आहे. कोण काय? बोलतय याला आम्ही जास्त महत्व देत नाही.
Read Also :