मुंबई : राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी भाजपवर खोचक टीका केली आहे. भाजपमधील आमदारांमध्ये प्रचंड नाराजीचे वातावरण आहे. त्यांना अस्वस्थता जाणवत आहे. भाजप आणि नेते सत्तेसाठी तळमळत आहे. देवेंद्र फडणवीस यांनी सकाळच्या शपतविधीची चुक मान्य केली. यावरून समजते त्यांच्यात किती नाराजी आहे, अशी खोचक टिका राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी केली. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
देवेंद्र फडणवीस यांना एका वृत्तवाहिनीच्या मुलाखतील सकाळच्या शपतविधी बद्दल प्रश्न विचारला असता, फडणवीसांनी अजित पवारांसोबत घेतलेल्या सकाळच्या शपतविधीची प्रांजळपणे कबुली दिली. यावरून आता एकनाथ खडसे यांनी खोचक टिका केली आहे. ते म्हणाले, मी भाजपमध्ये असताना मी अनेक नेत्यांना भाजपात प्रवेश दिली. मी त्यांनी जवळून ओळखतो. त्यांच्या भावना समजतो. त्यांच्या नेमके काय चालायचे हे मला चांगले ठावूक आहे, असे ते म्हणाले.
भाजपच्या आमदारांमध्ये सत्ता नसल्यामुळे प्रचंड नाराजी पसरली आहे. भाजपचे नेते वारंवार सांगत आहेत की हे सरकार पडेल. यावरून दिसून येते की त्यांच्यात किती नाराजी पसरली आहे. भाजपचे नेते सत्तेसाठी तळमळत आहेत. मला माहिती आहे, सत्तेसाठी भाजप किती भुकेला आहे, असे खडसे यांनी यावेळी बोलताना सांगितले.
Read Also :