नवी दिल्ली : उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, सरसंघचालक मोहन भागवत यांच्यासह काही लोकांच्या ट्विटर अकाउंटची ब्लू टिक हटवल्याने ट्विटरवर टीका झाली होती. नवीन नियमावली लागू न केल्याने आधीच केंद्रासोबत संघर्ष सुरू असतानाच ब्लू टिक हटवल्याने टीकेची झोड उठली होती. टीकेनंतर पुन्हा ब्लू टिक अकाउंटवर झळकू लागली. मात्र या सर्व घटनाक्रमावरून काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.
एकीकडे देशात कोरोना व्हायरस महामारीचे संकट आहे. तर अर्थव्यवस्था देखील घसरली आहे. लसीकरण देखील मंदावले आहे. या सर्व गोष्टीवरून राहुल गांधींनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.
ब्लू टिक के लिए मोदी सरकार लड़ रही है-
कोविड टीका चाहिए तो आत्मनिर्भर बनो!#Priorities— Rahul Gandhi (@RahulGandhi) June 6, 2021
ब्लू टिकसाठी मोदी सरकार भांडत आहे, कोविडची लस हवी असेल, तर आत्मनिर्भर व्हा, असे खोचक ट्विट करत राहुल गांधींनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.
दरम्यान, केंद्र सरकारने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मसाठी आणलेली नवीन नियमांची अंमलबजावणी अद्याप ट्विटरकडून करण्यात आली नाही. तसेच, टूल किट प्रकरणावरून देखील ट्विटरला नोटीस बजावण्यात आली होती.
Read Also :
- ‘भगवा होता म्हणून तिरंगा निर्माण झाला, विरोध करणारे नतदृष्ट कोण?’
- ‘महाराष्ट्राला दीड कोटी लस देणार असल्याने केंद्र सरकारने पुनावालांना तंबी दिली’
- ‘नैतिकता विकणाऱ्यांनी नैतिकतेवर बोललं की लोकं चंपा म्हणतात’
- ‘अजितदादांनी शरद पवारांच्या ड्राव्हरमधून 54 आमदारांची यादी चोरणे हे कोणत्या नैतिकतेत बसते?’
- ‘उद्धव ठाकरेंनी खुर्चीसाठी बाळासाहेब ठाकरेंचे विचारचं गाडून टाकले’