मुंबई : मुख्यमंत्रीपदाची खुर्ची हे माझं स्वप्न कधीच नव्हतं, पण मुलाचं कर्तव्य आणि बाळासाहेब ठाकरेंना दिलेलं वचन पूर्ण करण्यासाठी मी खुर्चीवर बसलो, असं वक्तव्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एका मुलाखतीमध्ये केले होते. या वरून आता भाजप नेते निलेश राणे यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे.
‘उद्धव ठाकरेंनी खुर्चीसाठी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंचे विचारचं गाडून टाकले आहेत’, अशी जोरदार टीका निलेश राणे यांनी मुख्यमंत्र्यांवर केली आहे.
निलेश राणे म्हणाले की, काय नाटक आहे… प्रॉपर्टीसाठी भाऊ कोर्टात आहे, कसलं कर्तव्य आणि कसलं काय. साहेबांनी सांगितलं होत काँग्रेसला कायमचा गाडून टाका. उद्धव ठाकरेंनी खुर्चीसाठी स्व. बाळासाहेब ठाकरेंचे विचारचं गाडून टाकले, अशी खोचक टीका निलेश राणे यांनी उद्धव ठाकरेंवर केली.
दरम्यान, पुत्रकर्तव्य पार पाडण्यासाठी मुख्यमंत्री झाल्याचे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. माझं कधीही स्वप्न नव्हतं. शेवटी एक पुत्रकर्तव्य असतं. मी माझ्या वडिलांना हातात हात घालून वचन दिलं होतं. मी तुमचा शिवसैनिक मुख्यमंत्रिपदावर बसवणार, असे उद्धव ठाकरे म्हणाले होते.
Read Also :
- ‘खुर्ची हे माझं स्वप्न कधीच नव्हतं, बाळासाहेबांना दिलेलं वचन पूर्ण करण्यासाठी मी खुर्चीवर’
- जिल्हा प्रशासनांनी परिस्थिती पाहून निर्बंधांबाबत निर्णय घ्यावा – उद्धव ठाकरे
- ‘काँग्रेसला हद्दपार करण्याची भाषा करणाऱ्यांना महाराष्ट्रातून हद्दपार केले’
- ‘मोदींची हिटलरशी तुलना योग्य नाही, हिटलरच्या काळात जर्मनी आर्थिक महासत्ता बनला होता’
- ‘पंतप्रधान स्वतःला फकीर मानतात, मग 15 एकरांच्या घराची गरजच काय?’