मुंबई : 2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्रीपदावरून भाजप-शिवसेना युती तुटली होती. त्यानंतर घडलेल्या घडामोडी उभ्या महाराष्ट्राने पाहिल्या. महाविकास आघाडी सरकार सत्तेत येऊन प्रथम ठाकरे घराण्यातील एखादी व्यक्ती मुख्यमंत्री झाली. आता मुख्यमंत्रीपद स्विकारण्याबाबत उद्धव ठाकरेंनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
मुख्यमंत्रीपदाची खुर्ची हे माझं स्वप्न कधीच नव्हतं, पण मुलाचं कर्तव्य आणि बाळासाहेब ठाकरेंना दिलेलं वचन पूर्ण करण्यासाठी मी खुर्चीवर बसलो आहे, असे उद्धव ठाकरेंनी म्हटले आहे. लोकसत्ता या वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये ते बोलते होते.
उद्धव ठाकरे म्हणाले की, माझं कधीही स्वप्न नव्हतं. शेवटी एक पुत्रकर्तव्य असतं. मी माझ्या वडिलांना हातात हात घालून वचन दिलं होतं. मी तुमचा शिवसैनिक मुख्यमंत्रिपदावर बसवणार.
मी जबाबदारी घेतली, मी माझ्यासाठी काही करत नाही, मला मुख्यमंत्रिपदाची अभिलाषा नव्हती. खुर्ची हे वैभव आहे, देवाची दया आहे, अनेकांचं स्वप्न या खुर्चीचं होतं. त्यामुळे माझी खुर्ची खेचाल, तुम्ही बसा. पण खुर्चीचा मुद्दा काय आहे तर काम करा, माझ्यापेक्षा दुसरा काम करत असेल तर बरं आहे, असेही ते म्हणाले.
Read Also :
- जिल्हा प्रशासनांनी परिस्थिती पाहून निर्बंधांबाबत निर्णय घ्यावा – उद्धव ठाकरे
- ‘काँग्रेसला हद्दपार करण्याची भाषा करणाऱ्यांना महाराष्ट्रातून हद्दपार केले’
- ‘मोदींची हिटलरशी तुलना योग्य नाही, हिटलरच्या काळात जर्मनी आर्थिक महासत्ता बनला होता’
- ‘पंतप्रधान स्वतःला फकीर मानतात, मग 15 एकरांच्या घराची गरजच काय?’
- ‘अनलॉक’च्या निर्णयाबाबत गोंधळ का झाला?, मुख्ममंत्री म्हणाले…