मुंबई : कोरोना व्हायरस संसर्गाच्या साखळी तोडण्यासाठी लावण्यात आलेले निर्बंध शिथिल करण्याच्या निर्णयाबाबत संभ्रमाची झाल्याचे पाहायला मिळाली होती. मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी पत्रकरा परिषद घेत अनलॉकबाबतची माहिती दिली होती. मात्र, काही मिनिटांमध्येच मुख्यमंत्री कार्यालयाने नियमांचा प्रस्ताव अजून विचाराधीन असल्याचे स्पष्ट करण्यात आले होते.
एकीकडे मंत्र्याने केलेली घोषणा व त्यानंतर मुख्यमंत्री कार्यालयाचे स्पष्टीकरण यावरून गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. याबाबत आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाष्य केले आहे.
विजय वडेट्टीवार यांचा निर्णयांबाबत गैरसमज झाला होता, त्यामुळे त्यांनी जाहीर केले, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी म्हटले आहे. लोकसत्ता वृत्तपत्राच्या एका कार्यक्रमात ते बोलत होते.
मुख्यमंत्री म्हणाले की, गेल्यावेळी लॉकडाउन शब्द वापरला नाही, पण निर्बंध लॉकडाउनसदृश्य लागू करावे लागले. मागच्या वेळी १५ दिवस उशीर झाला. गेल्या वेळी सगळ्यांना विश्वासात घ्यावं लागलं. सगळ्यांशी बोलण्यात वेळ गेला. त्यामुळे हे निकष लागू केले. अजूनही निर्बंध उठवल्याचं जाहीर केलेलं नाही. स्थानिक प्रशासन हा निर्णय घेणार आहे.
प्रशासनाला मदत होण्यासाठी हे निकष ठरवण्यात आले आहेत. कारण प्रशासनाला परिस्थितीचा आढावा घेऊन निर्णय घेता यावा, म्हणून हे करण्यात आलं आहे. पण, निर्बंध उठवण्यात आलेले नाहीत. आपत्ती व्यवस्थापन समितीची बैठक होती. त्यात दहावी-बारावी परीक्षेच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आलं. त्यात हे निकष सूचवण्यात आले. त्यात विजय वडेट्टीवारांचा गैरसमज झाला. त्यांना वाटलं निर्णय निश्चित झाला आहे. त्यामुळे त्यांनी जाहीर केलं. पण प्रशासनाला आढावा घेण्याची सूचना त्यावेळीच करण्यात आली होती, असे स्पष्टीकरण मुख्यमंत्र्यांनी दिले.
Read Also :
- माध्यमांमध्ये जेवढी छाननी आमच्या सरकारची व्हायची, तेवढी आता होत नाही!
- ‘राऊतांच्या धमक्यांना घाबरलो, मला आता पोलीस संरक्षण द्यावे लागेल’
- पुणे उद्यापासून ‘अनलॉक’, जाणून घ्या काय सुरु, काय बंद?
- ‘मराठा समाजच अशोक चव्हाणांचा राजीनामा मागेल, भाजप मागणार नाही’
- ‘नारायण राणे मुख्यमंत्री असताना त्यांनी मराठा आरक्षण का दिले नाही?’