मुंबई : मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून राज्यातील राजकारण तापताना दिसत असून, भाजपने महाविकास आघाडी सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. मराठा आरक्षण विषयक मंत्रीमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी राजीनामा देण्याचा मागणी आता पुढे आहे. यावर आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी भाष्य केले आहे.
मराठा समाजच अशोक चव्हाण यांचा राजीनामा मागेल, मी अथवा आमचा पक्ष मागणार नाही, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.
@AshokChavanINC मराठा समाजाला न्याय देऊ शकत नाहीत अशी भावना जर मराठा समाजात रुजली असेल तर मराठा समाज त्यांचा राजीनामा मागेल, पण मी व्यक्तिशः व आमचा पक्ष कोणाचाही राजीनामा मागणार नाही. हे सगळे कामकाज त्यांनी नीट सतर्कतेने पाहावे हेच आमचे म्हणणे आहे. pic.twitter.com/zjPEBkAGDD
— Chandrakant Patil (@ChDadaPatil) June 5, 2021
चंद्रकांत पाटील म्हणाले की, अशोक चव्हाण मराठा समाजाला न्याय देऊ शकत नाहीत अशी भावना जर मराठा समाजात रुजली असेल तर मराठा समाज त्यांचा राजीनामा मागेल, पण मी व्यक्तिशः व आमचा पक्ष कोणाचाही राजीनामा मागणार नाही. हे सगळे कामकाज त्यांनी नीट सतर्कतेने पाहावे हेच आमचे म्हणणे आहे.
मराठा आरक्षणासंदर्भातील निकालपत्र अभ्यासण्यासाठी महाविकास आघाडी सरकारने एक समिती नेमली होती. या समितीने आपला अहवाल दिला आहे. पण या समितीने दाखल केलेल्या अहवालात आम्ही वारंवार मांडत असलेले निष्कर्षच अधोरेखित केले आहेत, असेही ते म्हणाले.
Read Also :
- ‘नारायण राणे मुख्यमंत्री असताना त्यांनी मराठा आरक्षण का दिले नाही?’
- ‘ED, CBI ची धमकी भारी, कुंकू वाचवायला कमळीच्या दारी’
- ‘अजित पवारांसोबत घेतलेल्या शपथविधीमुळे प्रतिमेला तडा गेला’
- ‘…तर पटोलेंच्या स्वबळाच्या नाऱ्याला आमचा पूर्ण पाठिंबा असेल’
- ‘एका मंत्र्यांचा अपमान होत असेल, तर काँग्रेसने कॅबिनेटमधून बाहेर पडावं’