मुंबई : 2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्री पदावरून भाजप आणि शिवसेनेची युती तुटली व त्यानंतर घडलेल्या राजकीय घडामोडी संपूर्ण महाराष्ट्राने पाहिल्या. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी भल्या पहाटे शपथ घेत स्थापन केलेले सरकार अवघे काही तासच टिकले. आता यावर फडणवीसांनी पुन्हा एकदा भाष्य करत यामुळे आपल्या प्रतिमेला तडा गेल्याचे म्हटले आहे.
राष्ट्रवादीसोबतचं सरकार करायला नको होतं. ती चूक आहे. असं सरकार आम्ही स्थापन करायला नको होतं, अशा शब्दात त्यांनी त्यावेळी भल्या पाहटे सरकार स्थापन करणे चूक केल्याचे म्हटले आहे. यासंदर्भात लोकसत्ताने वृत्त दिले आहे.
अजित पवार यांच्यासोबतच्या शपथविधीमुळे आपल्या प्रतिमेला तडा गेल्याचंही देवेंद्र फडणवीस म्हणाले. ते म्हणाले की, ज्यावेळी तुमच्या पाठीत खंजीर खुपसला जातो तेव्हा राजकारणात तुम्हाला जिवंत राहावं लागतं. राजकारणात तुम्ही मेलात तर त्याला उत्तर देता येत नाही.
खंजीर खुपसणाऱ्याला आम्हाला उत्तर द्यायचं होतं. त्यावेळच्या भावना आणि राग होता. त्यातून आम्ही ते केलं. परंतु ते चुकीचं होतं आणि आमच्या समर्थकांनाही ते आवडलं नाही. त्यांच्यात माझी जी प्रतिमा होती त्याला काहीशा प्रमाणात तडा गेला. आपला तो निर्णय चुकीचाच होता, पण त्याचा आता पश्चाताप नाहीस, असे फडणवीस म्हणाले.
Read Also :
- ‘…तर पटोलेंच्या स्वबळाच्या नाऱ्याला आमचा पूर्ण पाठिंबा असेल’
- ‘एका मंत्र्यांचा अपमान होत असेल, तर काँग्रेसने कॅबिनेटमधून बाहेर पडावं’
- महाराष्ट्र 5 टप्प्यात लॉकडाऊन हटणार, नियमावली जारी
- ‘मुंबई महापालिकेचे ग्लोबल टेंडर म्हणजे बिरबलाची खिचडी होती’
- भोसले समितीचा अहवाल सादर, मराठा आरक्षणाबाबत पुनर्विलोकन याचिका दाखल करण्याची शिफारस