मुंबई : भगवा झेंडा लावणे ही महाराष्ट्राची शान आहे. याला विरोध करणारे ते नतद्रष्ट कोण आहेत? अशा घुबडांची काळजी न करता छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिष्ठा राहील अशी कार्यवाही सरकारने करावी, असे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे.
अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी शासकीय कार्यालयावर भगवा झेंडा लावण्यास विरोध केला होता. महाराष्ट्रातील सरकारी कार्यालयांवर भगवा ध्वज फडकवण्याविरोधात आपण सुप्रीम कोर्टात जाऊ शकतो, असे त्यांनी म्हटले आहे. सदावर्ते यांच्या या वक्तव्याचा आता संजय राऊत यांनी समाचार घेतला आहे.
संजय राऊत म्हणाले की, भगवा झेंडा लावणे ही महाराष्ट्रीची शान आहे, प्रतिष्ठा आहे. ज्यांच्या नावाने आपण हे राज्य चालवत आहोत त्या छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेकदिन आहे. ज्या दिवसाने आम्हाला स्वातंत्र्याची, स्वाभिमानाची आणि पहिले हिंदवी स्वराज्य स्थापन करण्याची प्रेरणा दिली, त्याला विरोध करणारे हे नतदृष्टे कोण आहेत?, असा सवाल त्यांनी केला.
सरकारने अशा घुबडांची काळजी न करता, फिकीर न करता, शिवरायांच्या या भगव्याची प्रतिष्ठा राहील, अशा प्रकारे कठोर कारवाई करावी, असे म्हणतानाच भगवा होता म्हणून तिरंगा निर्माण झाला. ज्यांना भगव्याचे महत्त्व कळत नसेल तर त्यांना महाराष्ट्रात राहण्याचा अधिकार नाही, असे राऊत म्हणाले.
Read Also :
- ‘महाराष्ट्राला दीड कोटी लस देणार असल्याने केंद्र सरकारने पुनावालांना तंबी दिली’
- ‘नैतिकता विकणाऱ्यांनी नैतिकतेवर बोललं की लोकं चंपा म्हणतात’
- ‘अजितदादांनी शरद पवारांच्या ड्राव्हरमधून 54 आमदारांची यादी चोरणे हे कोणत्या नैतिकतेत बसते?’
- ‘उद्धव ठाकरेंनी खुर्चीसाठी बाळासाहेब ठाकरेंचे विचारचं गाडून टाकले’
- ‘खुर्ची हे माझं स्वप्न कधीच नव्हतं, बाळासाहेबांना दिलेलं वचन पूर्ण करण्यासाठी मी खुर्चीवर’