अहमदनगर : लसीच्या अपुऱ्या पुरवठ्यामुळे लसीकरण मंदावले आहे. राज्य सरकार सातत्याने लसीचा पुरवठा करण्याची केंद्राकडे मागणी करत आहे. यातच आता सीरम कंपनीचे प्रमुख अदर पुनावाला राज्य सरकारला दीड कोटी कोरोना लसीचे डोस देणार होते. मात्र, त्याआधीच केंद्र सरकारने त्यांना तंबी दिली आणि त्यामुळे ते लंडनला गेले, असा गंभीर आरोप ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केला आहे.
लसीकरणाच्या मुद्यावरून केंद्र सरकार आणि राज्य सरकार आमनेसामने आल्याचे चित्र पाहायला मिळाले होते. तसेच, अदर पुनावाला हे लंडनला निघून गेल्याचे देखील वृत्त समोर आले होते. यातच आता हसन मुश्रीफ यांनी गंभीर आरोप केले आहेत.
जे फ्रंटलाईनला काम करत आहेत त्यांनी कोरोना लसीचे दोन डोस घेतले पाहिजेत. कोरोना लसींचं सर्व नियंत्रण केंद्राने आपल्या हातात घेण्याची आवश्यकता आहे. मात्र, केंद्र सरकार 45 वर्षांवरील ते करणार आणि 18-44 वयोगटातील राज्यांनी करावं असं सांगत आहे हे बरोबर नाही, असे मुश्रीफ म्हणाले.
काही कंपन्या म्हणाल्या आम्ही तुमच्यासोबत नाही केंद्र सरकारसोबत बोलू. पुण्यात असलेली सीरम कंपनीचे प्रमुख अदर पुनावाला यांनी जूनपासून दीड कोटी कोरोना लसी देण्याचं ठरवलं होतं. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्यांना केंद्र सरकारने तंबी दिली आणि ते लंडनला जाऊन बसले. महाराष्ट्रात तयार होणारी कोरोना लसही आपल्याला दिली जात नाहीये. एकीकडे हे राज्यांना लसीकरण करायला लावतात, दुसरीकडे लस उत्पादकांना धमक्या द्यायच्या ही पद्धत बरोबर नाही, असे म्हणत त्यांनी केंद्रावर निशाणा साधला.
Read Also :
- ‘नैतिकता विकणाऱ्यांनी नैतिकतेवर बोललं की लोकं चंपा म्हणतात’
- ‘अजितदादांनी शरद पवारांच्या ड्राव्हरमधून 54 आमदारांची यादी चोरणे हे कोणत्या नैतिकतेत बसते?’
- ‘उद्धव ठाकरेंनी खुर्चीसाठी बाळासाहेब ठाकरेंचे विचारचं गाडून टाकले’
- ‘खुर्ची हे माझं स्वप्न कधीच नव्हतं, बाळासाहेबांना दिलेलं वचन पूर्ण करण्यासाठी मी खुर्चीवर’
- जिल्हा प्रशासनांनी परिस्थिती पाहून निर्बंधांबाबत निर्णय घ्यावा – उद्धव ठाकरे