मुंबई : मार्च महिन्यापासून वाढलेली कोरोनारुग्णांची संख्या कमी होताना दिसत आहे. राज्य सरकारने निर्बंध देखील शिथिल केले असून, आता हळूहळू सर्व गोष्टी सुरू होत आहे. याच पार्श्वभूमीवर र्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चित्रपट आणि टीव्ही मालिका निर्मात्यांशी दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधला. या चर्चेमध्ये मुख्यमंत्र्यांनी शासन घेत असलेल्या निर्णयांच्या अनुषंगाने सहकार्य करावे, असे आवाहन केले.
निर्मात्यांनी राज्य शासनाने दिलेल्या नियमांचे काटेकोर पालन करणे आवश्यक आहे. चित्रीकरणासाठी सावधानता आणि खबरदारी पाळायची आहे. तसेच ब्रेक दि चेनमधील नव्या वर्गवारीप्रमाणे नियमांचे पालन करा. येत्या काळात मुंबईतील कोविड बधितांची संख्या नियंत्रणात आली, तर मुंबईत चित्रीकरणासाठी परवानगी देऊ, असे आश्वासन यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिले.
कोविड संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चित्रपट आणि टीव्ही मालिका निर्मात्यांशी ई-संवाद साधला. शासन घेत असलेल्या निर्णयांच्या अनुषंगाने सहकार्य करावे. चित्रीकरणासाठी सावधानता आणि खबरदारी बाळगावी. नव्या वर्गवारीप्रमाणे नियमांचे पालन आवश्यक- मुख्यमंत्री pic.twitter.com/rBGU6NINXU
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) June 6, 2021
सगळेच बंद होते आणि मग चित्रीकरणाचे नॉकडाऊन होते. मात्र आता आपल्याला हळूहळू अनलॉक करत असताना लॉकडाऊन नको आणि नॉकडाऊन नको असे मुख्यमंत्री म्हणाले.
ज्या शहरांमध्ये, गावांमध्ये, जिल्ह्यांमध्ये पॉझिटिव्हीटीचा रेट हा 5 ते 10 टक्क्यांमध्ये आहे तिथे हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन बेडवर उपचार घेणारे रुग्ण 40 टक्क्यांहून अधिक आहे. ते सर्वजण लेव्हल तीनमध्ये येतात. अशा जिल्ह्यांमध्ये मालिका, सिनेमाची चित्रीकरणे केली जाऊ शकतात. परंतु त्यासाठी काटेकोर नियमांचे पालन सक्तीचे आहे. चित्रीकरण आखून दिलेल्या नियमांमध्ये करणे आवश्यक आहे. चित्रीकरणाशी संबंधित असलेले कलाकार, तंत्रज्ञ, इतर कर्मचाऱ्यांना ‘बायोबबल’ वातावरणातच राहणे बंधनकारक आहे. तसेच अधिकाधिक कलाकारांचे लसीकरण करण्यावर भर देण्यात यावा, असेही ते म्हणाले.
Read Also :
- ‘ ट्विटर मोदी सरकारसाठी राजकीय लढ्याचा आत्मा होता; पण…’
- ‘केंद्र सरकार ‘ब्लू टिक’साठी भांडतंय, लसीसाठी आत्मनिर्भर बना’
- ‘भगवा होता म्हणून तिरंगा निर्माण झाला, विरोध करणारे नतदृष्ट कोण?’
- ‘महाराष्ट्राला दीड कोटी लस देणार असल्याने केंद्र सरकारने पुनावालांना तंबी दिली’
- ‘नैतिकता विकणाऱ्यांनी नैतिकतेवर बोललं की लोकं चंपा म्हणतात’