मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे कोरोनाकाळात महाराष्ट्रातील जनतेला स्वत:ची काळजी घेण्याचे कायम आवाहन करताना दिसतात. विरोधक त्यांच्या कार्यपद्धतीची अनेकदा टिंगल करतानाही दिसतात. भाजपचे निलेश राणे यांनी ठाकरे सरकारच्या कार्यपद्धतीवर वेळोवेळी रोखठोक शब्दांत टीका केली. नुकतेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुलाखतीत एक वक्तव्य केले. त्या वक्तव्यावरून निलेश राणे यांनी त्यांच्यावर सडकून टीका केली.
देशासाठी आणि राज्यासाठी जे एकत्र येऊ शकतात, त्यांनी आताच्या घडीला एकत्र यावं. सध्या देशात जे संकट आहे, ते साधंसुधं नाही. या परिस्थितीला योग्यप्रकारे सामोरं गेलो नाही तर देशात अराजक येईल. खुर्ची हे माझं स्वप्न नव्हतं, पण काळ कठीण आहे. पुत्रकर्तव्य म्हणून मी खुर्चीवर आहे. बाळासाहेबांना हातात हात देऊन वचन दिलं होतं, तुमचा शिवसैनिक मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर बसवेन, असं उद्धव ठाकरे यांनी लोकसत्ताला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं. त्यावरून निलेश राणेंनी त्यांच्यावर टीका केली. “काय नाटक आहे… प्रॉपर्टीसाठी भाऊ कोर्टात आहे, कसलं कर्तव्य आणि कसलं काय. साहेबांनी सांगितलं होत काँग्रेसला कायमचं गाडून टाका. उद्धव ठाकरेंनी खुर्चीसाठी स्व. बाळासाहेब ठाकरेंचे विचारच गाडून टाकले”, अशा शब्दात निलेश राणेंनी त्यांच्या कार्यपद्धतीला टोला लगावला.
“लॉकडाऊन किती काळ चालवायचा आहे हे आम्हालाही माहिती नाही. माझी प्राथमिकता ही जीव वाचवण्याला आहे. घरचा कर्ता पुरुष गेला तर अर्थचक्राला काय अर्थ उरणार? माझं म्हणणं आहे की जे-जे या विचारासाठी एकत्र येऊ शकतात, त्यांनी एकत्र यायला हवं. अशा परिस्थितीत राजकारण थांबवावं. खुर्ची हे माझं स्वप्न नव्हतं, पण काळ कठीण आहे. पुत्रकर्तव्य म्हणून मी खुर्चीवर आहे. बाळासाहेबांना हातात हात देऊन वचन दिलं होतं, तुमचा शिवसैनिक मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर बसवेन. माझं हे वचन सुरू झालंय पण अजून पूर्ण झालेलं नाही. मी जबाबदारी घेतली, असे विचार उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केले.
Read Also :
- ‘आता आपल्याला लॉकडाऊन नको आणि नॉकडाऊनही नको’
- ‘ ट्विटर मोदी सरकारसाठी राजकीय लढ्याचा आत्मा होता; पण…’
- ‘केंद्र सरकार ‘ब्लू टिक’साठी भांडतंय, लसीसाठी आत्मनिर्भर बना’
- ‘भगवा होता म्हणून तिरंगा निर्माण झाला, विरोध करणारे नतदृष्ट कोण?’
- ‘महाराष्ट्राला दीड कोटी लस देणार असल्याने केंद्र सरकारने पुनावालांना तंबी दिली’