बीड : मागील दोन वर्षांमध्ये कोरोनाच्या महामारीने थैमान घातले होते. यामध्ये बऱ्याच कुटुंबियांना आपले जवळचे व्यक्ती, नातेवाईक आणि इतरही लोकांना गमवावे लागले होते. सरकारने कोरोनामध्ये मृत पावलेल्या कुटुंबियांसाठी आर्थिक सहाय्य म्हणून ५० हजार रुपयांची मदत देण्याचे घोषित केले आहे.
धक्कादायक..! अधिवेशन सुरु असताना विधानभवनाबाहेर महिलेचा आत्मदहनाचा प्रयत्न
५० हजार रुपयांची आर्थिक मदत मिळणार हे ठीक आहे मात्र बीड जिल्ह्यातील अंबेजोगाईमध्ये भलताच प्रकार समोर आला आहे. २१६ जिवंत व्यक्तींचा समावेश हा चक्क मृत व्यक्तींमध्ये करण्यात आला आहे. यासंदर्भात ज्या व्यक्तींची नावे मृतांच्या यादीमध्ये आली आहेत त्यांना तर या सर्व गोष्टींचा धक्का बसला आहे. पत्रकार नागनाथ वारद हे जिवंत असूनही पालिकेचे लोक त्यांच्याकडे चौकशीसाठी गेले होते. ते जिवंत असताना कर्मचारी त्यांच्या मृत्यूची चौकशी करत असल्याने त्यांनी कर्मचाऱ्यांना चांगलेच फटकारले.
हे फक्त अंबेजोगाईमध्ये नाही तर लातूरमध्ये देखील घडलं आहे. हे सर्वेक्षण करत असताना काही लोक जिवंत असल्याचे समोर आले आहे. ज्या ठिकाणी मृत व्यक्ती झालेले नाहीत त्यांना मदत मिळणार नाही असं पालिकेच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलं आहे. मात्र हा सर्व प्रकार कशासाठी ? ५० हजार रुपयांसाठी काहींनी स्वतःला मृत केले की शासनाचा गलथान कारभार म्हणून या सर्व गोष्टी झाल्या आहेत ? असे प्रश्न आता सर्वांना पडण्यास सुरुवात झाली आहे. यावर आता सरकारकडून आणि जिवंत असलेल्या व्यक्तींकडून काय भूमिका घेतली जाणार हे पाहणे औत्सुकतेचे ठरणार आहे.
Read also:
- राणेंच्या म्याव म्यावचे विधानसभेत पडसाद; फडणवीस, पवार, मुनगंटीवारांनी टोचले राणेंचे कान
- पवार घराण्यावर विश्वास ठेऊ नका हे आम्ही आधीपासूनच सांगत होतो; एसटी कामगारांवरून पडळकर बरसले
- महाराष्ट्रातील निवडणुकांवर ओमिक्रॉनचे सावट; विधासभेत चर्चा निवडणूका पुढं ढकलणार ?
- विधानसभेत ‘झोपा काढता का रे?’; अजित पवार नेमके कुणावर भडकले?
- विधानसभेत शिवसेना आमदारानेच जाहीर केली मुख्यमंत्र्यांवरची नाराजी…