मुंबई : मुंबईत इंडियाची आज आणि उद्या महत्वाची बैठक होत असून याची जबाबदारी महाविकास आघाडीकडे देण्यात आली आहे. या बैठकीसाठी देशातील प्रमुख २८ पक्षांचे नेते मुंबईत येणार असून त्यांचं स्वागत तसेच संपुर्ण कार्यक्रम महाराष्ट्रीय पद्धतीने होणार आहे. मुंबईतील ग्रॅंड हयात हॉटेलमध्ये इंडियाची बैठक होत असून यासाठी किती खर्च करण्यात येत आहेत. त्याबाबत शिंदे गटातील आमदार आणि मंत्री उदय सामंत यांनी माहिती दिलीय.
हेही वाचा…“सत्ता नहीं, पार्टी नहीं, तभी उद्धव ठाकरे का इतना डर”, दानवेंनी भाजपला डिवचलं
इंडिया आघाडीची बैठक १४-१५ तासांचा इव्हेंट आही. आम्ही गुवाहाटीला गेलो तेव्हा आम्ही पंचतारांकित हॉटेलमध्ये राहिलो असल्याचा आमच्यावर आरोप झाला. परंतु मुंबईबद्दल इंडिया आघाडीच्या बैठकीत अॅलर्जीं आहे. पण मुंबईती जुन्या खुर्च्या काढून त्याठिकाणी ४५ हजारांची एक खूर्ची अशा ६५ खुर्च्या नवीन घेण्यात आल्या आहेत. त्यामुळे १४ तासांसाठई एका नेत्याला बसायला ४५ हजारांची खुर्ची घेतली जाते असं सामंतांनी म्हटलंय.
हेही वाचा…स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा निर्णय पुन्हा लांबणीवर, कोर्टाकडून ‘ही’ नवीन तारिख जाहीर
दरम्यान, आघाडीच्या नेत्यांसाठी फाईव्ह स्टार हॉटेलमधील ६५ खोल्या बुक केल्या असून एका खोलीची किमंत २५ ते ३० हजार रूपये आहे. तर मराठमोळ्या जेवणाची व्यवस्था ताटाला ४५०० हजार आहे. आता १४ तासांसाठी कोट्यवधी रूपये खर्च केले जात आहेत. या लोकसभा निवडणुकीनंतर हे सगळे बेरोजगार होणार आहेत. असा टोलाही त्यांनी लगावला आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“विकासाच्या नावाखाली केंद्राची वक्र नजर राजधानी मुंबईवर वळली”, राष्ट्रवादीची भाजपवर जहरी टिका
हेही वाचा…शरद पवारांचा खंदा समर्थकानी घेतली मोठी भूमिका, निवडणुकीपुर्वी कोणत्या गटात जाणार ?
हेही वाचा…“विश्वगुरू अन् भाजप-आरएसएसच्या गुंडांनी प्रश्नांची उत्तरं द्या,” प्रकाश आंबेडकरांचा भाजपवर संताप
हेही वाचा…“राज्यातील महसुल अधिकारीच सुरक्षित नाहीत? ऑफिसमधील छत कोसळलं,” वडेट्टीवारांचा सरकारवर संताप
हेही वाचा…झुनका भाकर, पुरणपोळी, वडापाव अन् बरच काही., इंडियाच्या बैठकीसाठी खास मेन्यू, महाराष्ट्रीय पदार्थांचा समावेश