लातूर : राज्यातील 12 हजारांपेक्षा अधिक ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचे निकाल हाती आले आहेत. भाजपसह, महाविकास आघाडीतील सर्वच पक्ष आपल्याच पक्षाला अधिक ग्रामपंचायतीमध्ये विजय मिळाल्याचा दावा करत आहे. यातच आता दिल्लीत प्रबळ असणाऱ्या आम आदमी पक्षाने देखील ग्रामपंचायत निवडणुकीच्या माध्यमातून महाराष्ट्रात खाते उघडली आहे.
लातूर जिल्ह्यातील दापक्याळ ग्रामपंचायत निवडणुकीत आपने विजय मिळवला आहे. आपचे जिल्हाध्यक्ष प्रताप भोसले यांच्या नेतृत्वात 7 पैकी 5 जागांवर आपच्या उमेदवारांना विजय मिळाला आहे.
विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन!
जनतेने आपल्यावर दाखवलेल्या विश्वासाला सार्थ करा, जनतेची सेवा करा. पुढील कार्यास शुभेच्छा. https://t.co/F89YnNX6ZQ
— Arvind Kejriwal (@ArvindKejriwal) January 18, 2021
याबाबत महाराष्ट्रातील आपचे नेते अजिंक्य शिंदे यांनी ट्विट करत माहिती दिली. शिंदे यांचे हे ट्विट रिट्विट करत आपचे अध्यक्ष आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी विजयी उमेदवारांना शुभेच्छा दिल्या.
विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन! जनतेने आपल्यावर दाखवलेल्या विश्वासाला सार्थ करा, जनतेची सेवा करा. पुढील कार्यास शुभेच्छा, असे मराठीतून ट्विट करत केजरीवालांनी सर्वांचे अभिनंदन केले.
Read Also :
- विना अपघात सेवा देणार्या एसटी चालकांना मिळणार मोठे बक्षीस, अनिल परब यांची घोषणा
- मुस्लिम समाजाच्या ‘किसानबाग’ आंदोलनामुळे आरएसएस-भाजपच्या जातीवादी राजकारणाला शह मिळेल – प्रकाश आंबेडकर
- आठवड्यातील चार दिवस होणार कोरोना लसीकरण, मुख्यमंत्र्यांची माहिती
- ‘माझ्या हाती राज्याचे स्टेअरिंग भक्कम’, उद्धव ठाकरेंचे सूचक वक्तव्य
- अर्णब गोस्वामी ‘चॅट’प्रकरणाची चौकशी करा, पृथ्वीराज चव्हाण यांची मागणी