मुंबई : कथित टीआरपी घोटाळयानंतर पत्रकार अर्णब गोस्वामी आणि बार्कचे माजी प्रमुख पार्थ दासगुप्ता यांचं व्हॉट्सअप संभाषण सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या संभाषणामध्ये राष्ट्रीय सुरक्षेसह अनेक गंभीर खुलासे समोर आले आहेत. या प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणी आता राज्यातील काँग्रेस नेते करत आहे.
हे चॅट मुंबई पोलिसांनी शोधून काढल्याची माहिती देतानाच, या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी, काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे.
मुंबई पोलिसांनी शोधून काढलेले अर्णब गोस्वामीचे चॅट अत्यंत गंभीर आहे. राष्ट्रीय सुरक्षेपासून ते घटनाबदल आणि राजकीय नेमणुकांची माहिती एका न्यूज अँकरला कशी मिळाली? केंद्र सरकारने या घटनेची सखोल चौकशी करणे आवश्यक आहे. संसदीय संरक्षण समितीनेदेखील या सर्व प्रकरणाची तातडीने दखल घ्यावी.
— Prithviraj Chavan (@prithvrj) January 17, 2021
मुंबई पोलिसांनी शोधून काढलेले अर्णब गोस्वामीचे चॅट अत्यंत गंभीर आहे. राष्ट्रीय सुरक्षेपासून ते घटनाबदल आणि राजकीय नेमणुकांची माहिती एका न्यूज अँकरला कशी मिळाली? असा सवाल चव्हाण यांनी केला आहे.
केंद्र सरकारने या घटनेची सखोल चौकशी करणे आवश्यक आहे. संसदीय संरक्षण समितीनेदेखील या सर्व प्रकरणाची तातडीने दखल घ्यावी, अशी मागणी देखील त्यांनी केली.
Read Also :
- ‘पंतप्रधानांना आव्हान देण्याची धानोरकरांची ऐपत नाही, आधी पक्षाची स्थिती बघावी’
- ‘सत्तास्थापनेसाठी थेट शरद पवारांशी चर्चा झाली होती’, फडणवीसांचा गौप्यस्फोट
- ‘मतांच्या चिंतेमुळेच शिवसेनेने ‘नामांतरा’चा सामना सुरू केला’, थोरातांचे जोरदार उत्तर
- ‘तथाकथित पत्रकार पंतप्रधान कार्यालयाचा खेळण्याप्रमाणे वापर करत आहे’
- ‘… आता बुटांनी हिशोब होईल’, तांडववरून राम कदम आक्रमक