मुंबई : टीआरपी घोटाळयानंतर रिपब्लिक टिव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांचे कथित व्हॉट्सअप चॅट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या चॅटमधून अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहे. काँग्रेस नेते सचिन सावंत याची चौकशी करण्याची मागणी केली आहे. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी देखील यावर प्रतिक्रिया दिली आहे.
महाविकास आघाडी सरकारने ‘टीआरपी’ घोटाळ्याची चौकशी केली नसती तर देशाचे खरे गुन्हेगार कधीच समोर आले नसते, असे मत जयंत पाटील यांनी व्यक्त केले आहे.
सदर व्यक्तीला देशातील सैनिकांचे बलिदान एक ‘विजयाचा’ क्षण वाटतो आहे.प्रसिद्ध झालेली ही सर्व माहिती वाचल्यावर खरे देशद्रोही कोण आहेत हे जनतेला कळेल.सदर इसम अत्यंत बिनधास्तपणे न्यायाधीशांना विकत घेण्याच्या गप्पा मारताना अत्यंत स्पष्टपणे दिसत आहे, न्यायालयाचा खऱ्या अर्थाने अवमान आहे.
— Jayant Patil (@Jayant_R_Patil) January 17, 2021
प्रसारमाध्यमांना लोकशाही व्यवस्थेचा चौथा स्तंभ मानण्यात आलं आहे. मात्र प्रसारमाध्यमांतील एक तथाकथित पत्रकार व्यक्ती देशाच्या पंतप्रधानांचे कार्यालय आणि प्रमुख मंत्रालयांना अक्षरशः खेळण्याप्रमाणे वापरून घेत आहे, हे नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या माहितीवरून समजते, असे जयंत पाटील म्हणाले.
या व्यक्तीला देशातील सैनिकांचे बलिदान एक ‘विजयाचा’ क्षण वाटतो आहे. प्रसिद्ध झालेली ही सर्व माहिती वाचल्यावर खरे देशद्रोही कोण आहेत हे जनतेला कळेल. संबंधित व्यक्ती अत्यंत बिनधास्तपणे न्यायाधीशांना विकत घेण्याच्या गप्पा मारताना स्पष्टपणे दिसत आहे. हा न्यायालयाचा खऱ्या अर्थाने अवमान आहे, असा आरोप देखील त्यांनी केला.
अनेक गोपनीय बातम्या देशाच्या संसदेला आणि अगदी देशाच्या मंत्रीमंडळाला अवगत होण्यापूर्वीच या व्यक्तीला माहिती होत्या. महाविकास आघाडी सरकारने या टीआरपी घोटाळ्याची चौकशी केली नसती तर या देशाचे हे खरे गुन्हेगार कधीच समोर आले नसते, असे जयंत पाटील म्हणाले.
Read Also :
- ‘… आता बुटांनी हिशोब होईल’, तांडववरून राम कदम आक्रमक
- ‘… त्या निमित्ताने मुख्यमंत्र्यांना लोक बघतील तरी’, भाजपचा खोचक टोला
- कृषी कायद्याविरोधात उद्धव ठाकरे, शरद पवार रस्त्यावर उतरणार
- … अन् आमदाराने जाहीर कार्यक्रमात थेट सुप्रिया सुळेंकडे केली मंत्रिपदाची मागणी
- ‘भाजपवाले खंडणी, ब्लॅकमेलिंग आणि किडनॅपिंगकरून वर आले’