नवी मुंबई : भाजप खंडणी, ब्लॅकमेलिंग आनि किडनॅपिंगकरून वर आले असून, भाजप चांगल्या लोकांच्या मागे ईडी लावत आहे, असा गंभीर आरोप काँग्रेसचे नेते आणि मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी केला आहे. ते नवी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित महाविकास आघाडीच्या मेळाव्यात बोलत होते.
खंडणी, ब्लॅकमेलिंग आणि किडनॅप करुन भाजप पक्ष वर आला आहे. भाजप चांगल्या लोकांच्या मागे ईडी लावत आहे. भाजप शिवसेनेसोबत इतकी वर्ष होती. ज्यांचे बोट धरुन तुम्ही महाराष्ट्रामध्ये आलात त्याच शिवसेनेला हे संपवायला निघाले होते. आता शिवसेना चांगलं काम करू लागली तर त्यांनी हिंदुत्वाचा मुद्दा काढला, अशी जोरदार टीका अस्लम शेख यांनी भाजपवर केली आहे.
गेल्या दहा-बारा वर्षात या नवी मुंबईसाठी काहीतरी करायची गरज होती. पण भाजपने निव्वळ खायचे काम केले, अशी टीकेची तोफ देखील त्यांनी डागली.
इथल्या भूमीपुत्रांसाठी मासेमारी करणाऱ्या कोळी बांधवासाठी आम्ही नक्की निर्णय घेऊ. कॅबिनेट मिटिंगमध्ये नवी मुंबईत बंदर कसे येईल यावर आम्ही लवकरच निर्णय घेऊ, असे आश्वासन देखील त्यांनी मेळाव्यात बोलताना दिले.
Read Also :
- धनंजय मुंडे प्रकरणाची चौकशी करा, आता या नेत्याने केली मागणी
- ग्रामपंचायत निवडणूक : विजयी उमेदवारांना मिरवणूक काढण्यास मनाई
- शिवसेना आता ‘या’ राज्यातील विधानसभा निवडणूक लढणार, संजय राऊतांची मोठी घोषणा
- ‘निलेश राणेंच्या डोक्यावर परिणाम झाला आहे’, अजित पवारांचे टीकास्त्र
- ‘कायद्यापेक्षा ना मंत्री मोठा ना संत्री’, गृहमंत्र्यांचे सूचक वक्तव्य