पुणे : राज्यातील 34 जिल्ह्यांमधील 12 हजार 711 ग्रामपंचायत निवडणुकांचा निकाल आज लागणार आहे. निकालानंतर कार्यकर्ते, उमेदवार जंगी पार्टी, मिरवणूक काढण्याच्या तयारीत असतील, तर त्यांना ते महागात पडू शकते. कारण राज्यातील बहुतांश जिल्ह्यातल विजयी मिरवणुका काढण्यास बंदी घालण्यात आली आहे.
कोरोन संकटाच्या पार्श्वभूमीवर विजयी मिरवणुका काढू नयेत, असे आदेश देण्यात आले आहेत. र सोमवारी पहाटे 12 पासून ते रात्री 12 पर्यंत दिवसभर मिरवणुका काढणे, रॅली काढणे, फटाके फोडणे, गुलाल उधळणे या सर्व गोष्टींना बंदी घालण्यात आल्याचे, पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी एका आदेशात म्हटले आहे.
सोमवारी पहाटे बारापासून रात्रीचे बारापर्यंत संपूर्ण दिवसात विजयी मिरवणूक काढणे, रॅली काढणे, फटाके फोडणे, गुलाल उधळणे, विना परवानगी फ्लेक्स अथवा बॅनर लावू लावण्यास बंदी घालण्यात आलेली आहे.
तसेच, सोमवारी रात्री दहा ते मंगळवारी सकाळी सहापर्यंत हॉटेल, ढाबे, खानावळी, चायनीज, पान टपरी या सेवा बंद राहणार आहेत.
Read Also :
- शिवसेना आता ‘या’ राज्यातील विधानसभा निवडणूक लढणार, संजय राऊतांची मोठी घोषणा
- ‘निलेश राणेंच्या डोक्यावर परिणाम झाला आहे’, अजित पवारांचे टीकास्त्र
- ‘कायद्यापेक्षा ना मंत्री मोठा ना संत्री’, गृहमंत्र्यांचे सूचक वक्तव्य
- ईडीच्या निशाण्यावर आणखी एक शिवसेना नेता ? किरीट सोमय्यांची चौकशीची मागणी
- ‘कोणी काही करू शकणार नाही, अशा भ्रमात राहू नका’, अण्णा हजारेंचा मोदी सरकारला इशारा