चंद्रपूर : पक्षाने आदेश द्यावा, वाराणसीत जाऊन पंतप्रधान मोदींचा पराभव करेल, अशी सिंहगर्जनाच काँग्रेसचे महाराष्ट्रातील एकमेव खासदार बाळू धानोरकरांनी एका कार्यक्रमात केली होती. यावर आता भाजप नेते आणि माजी केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहिर यांनी प्रतिक्रिया दिली असून, धानोरकरांची पंतप्रधानांना आव्हान देण्याची ऐपत नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.
पक्षाने फक्त आदेश द्यावा, वाराणसीत जाऊन लढायची ताकत माझ्यामध्ये आहे. आता तीन वर्ष बाकी आहेत. या तीन वर्षाच्या कालखंडात पक्षानं आदेश द्यावा की धानोरकर जा तुम्ही वाराणसीत. जर मी गेलो नाही, लढलो नाही आणि जर नाही मोदींचा ट्रम्प केला तर नावाचा बाळू धानोरकर सांगणार नाही, असे धानोरकर म्हणाले होते.
धानोरकर यांच्यावर टीका करत हंसराज अहिर म्हणाले की, तकी वाईट परिस्थिती काँग्रेस पक्षाची असताना खासदार बाळू धानोरकर यांची भाषा म्हणजे विकृत मानसिक चाळे आहेत.
बाळू धानोरकर यांच्यात विजयाचा उन्माद दिसून आलाय, देशाच्या पंतप्रधानांना आव्हान देण्याची त्यांची ऐपत नाही, त्यांनी पहिले आपल्या राष्ट्रीय पक्षाची स्थिती पाहून घ्यावी, विरोधी पक्षाचा नेता बनवायची यांची ताकत नाही, असा टोला देखील त्यांनी लगावला.
Read Also :
- ‘सत्तास्थापनेसाठी थेट शरद पवारांशी चर्चा झाली होती’, फडणवीसांचा गौप्यस्फोट
- ‘मतांच्या चिंतेमुळेच शिवसेनेने ‘नामांतरा’चा सामना सुरू केला’, थोरातांचे जोरदार उत्तर
- ‘तथाकथित पत्रकार पंतप्रधान कार्यालयाचा खेळण्याप्रमाणे वापर करत आहे’
- ‘… आता बुटांनी हिशोब होईल’, तांडववरून राम कदम आक्रमक
- ‘… त्या निमित्ताने मुख्यमंत्र्यांना लोक बघतील तरी’, भाजपचा खोचक टोला