मुंबई : अभिनेत्री कंगना रानौतवरून राज्याचे वातावरण चांगलेच तापले आहे. कंगनाच्या ऑफिसवर बीएमसीने कारवाई केल्यावर अभिनेत्री रेणुका शहाणेने सरकारवला प्रश्न विचारला आहे.
ट्विटरच्या माध्यमातून अभिनेत्री रेणूका शहाणे (यांनी देखील याबाबत आपले मत मांडले आहे. रेणुका शहाणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना ट्वीटमध्ये टॅग करत याप्रकरणी लक्ष घालण्याचे आवाहन केले आहे.
त्यांनी असे म्हटले आहे की, ‘मला जरी कंगनाचे मुंबईला पाकव्याप्त काश्मीरशी तुलना करणारे वक्तव्य रुचले नसले तरीही सूडभावनेने बीएमसीने केलेल्या उध्वस्ततेमुळे मी अस्वस्थ झाले आहे. तुम्हाला इतके खालच्या स्तरावर जाण्याची गरज नाही. उद्धव ठाकरे कृपया यामध्ये हस्तक्षेप करा. आपण सर्वजण पँडेमिकचा सामना करत आहोत. आता या अनावश्यक नाटकाची गरज आहे का?’.
Though I did not like @KanganaTeam 's comment comparing Mumbai to POK I am appalled by the revenge demolition carried out by @mybmc You do not have to stoop so low. @CMOMaharashtra please intervene. There is a pandemic we are dealing with. Do we need this unnecessary drama?
— Renuka Shahane (@renukash) September 9, 2020
दरम्यान कंगना मुंबईतल्या तिच्या निवास्थानी दाखल होताच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली आहे. कंगनाने मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख केल्याने पुन्हा एकदा हा वाद चिखळण्याची शक्यता आहे.
Read Also
उद्धव ठाकरे आज मेरा घर टुटा है ! कल तेरा घमंड टुटेगा,कंगनाचा हल्लाबोल