मुंबई : वेदांता फॉक्सकॉननंतर आता एअरबस प्रकल्प देखील गुजरातला गेल्याने विरोधकांनी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. त्यालाच आज प्रत्युत्तर म्हणून राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुराव्यासह विरोधकांच्या टिकेला प्रत्युत्तर दिलं आहे. त्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण आता चांगलंच तापलं आहे.
“शरद पवार यांची तब्बेत बिघडली..! ब्रीच रूग्णालयात दाखल
राज्यातील प्रकल्प गुजराताला गेल्याने काल विरोधकांनी नागपुर येथे सरकारविरोधात आंदोलन केलं. त्याबाबत भाष्य करताना अंदोलकांचा उल्लेख शेंबडी पोरं म्हणून केला. त्यावर आदित्या ठाकरे यांनी फडणवीसांनी आपले शब्द मागे घ्यावेत असं म्हटलं आहे. कारण जी लोकं आपल्या राज्यातील विकासासाठी आवाज उठवत आहेत. त्यांचा उल्लेख जर उपमुख्यमंत्री अशा पद्धतीने करीत असतील तर हे योग्य नाही. असं आदित्य ठाकरे म्हणाले.
मुख्यमंत्र्यांना आव्हान करत ते म्हणाले की, त्यांनी समोरासमोर बोलावे चर्चा करावी. सर्व परिस्थिती अनुकूल असून प्रकल्प का बाहेर गेले. तुम्ही बल्क ड्रग पार्क इतरांना दिला पण महाराष्ट्रात दिला नाही. मविआ काळात साडे सहा लाखांची गुंतवणूक आणली. आम्ही असतो तर प्रकल्प आणले असते. पत्रकारांना एचेमव्ही म्हणाले. बेरोजगारांना शेमडी पोर संबोधले. जे आवाज उठवतात त्यांच्यावर निंदनीय टीका असंही ते म्हणाले.
महाराष्ट्राला इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टरला मंजरी..! विरोधकांच्या टिकेला फडणवीसांचं उत्तर
वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प आणि एअरबस प्रकल्पाबाबत मला अधिकाऱ्यांनी सांगितलं होतं की, महाविकास आघाडी सरकार असताना याठिकाणी वातावरण चांगलं नाही. असं विधान देवेंद्र फडणवीसांनी केलं. त्यावर आदित्य ठाकरे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ते म्हणाले की, मी उपमुख्यमंत्र्यांना चॅलेंज देतो की, ज्या कंपनीच्या अधिकाऱ्याने महाराष्ट्रात वातावरण खराब आहे, असे म्हटले त्याचे नाव सांगावे. कारण आम्हाला कंपनीने सांगितले की, केंद्र जिथे सांगेल तिथे आम्हाला प्रकल्प लावावा लागेल. असंही आदित्य ठाकरे म्हणाले.
Read also
- फडणवीसांनी कागदपत्रासह पुरावे दाखविले; ठाकरेंनी थेट ‘वन टू वन’ करण्याचं दिले आव्हान
- “माजले होते बोके, कोरोनात खाऊन खोके, आता होणार चौकशी ओके”; शेलारांचा टोला
- 12,000,00,00,000…! या आकड्याची आता CAG कडून चौकशी: चित्रा वाघ यांनी सेनेला डिवचलं
- “काळजी करू नका..! मोदींनी महाराष्ट्राला 2000 कोटींची भेट दिली”; देवेंद्र फडणवीस
- “प्रत्येक प्रकल्प गुजरातलाच का जातो? पंतप्रधानांचा विचार विशाल असायला हवं”; राज ठाकरे