मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी १०० कोटींच्या वसुलीचे गंभीर आरोप केले आहेत. त्यावरून त्यांची सीबीआय आणि ईडी या दोन केंद्रीय तपास यंत्रणांकडून चौकशी केली जात आहे. तसेच, त्यांच्यावर सीबीआय पाठोपाठ आता ईडीकडूनही चौकशीची टांगती तलवार आहे. यातच देशमुखांचे जावई गौरव चतुर्वेदी यांची अचानक सीबीआयने २० मिनिटे चौकशी केली, तर वकील आनंद डागा यांना अटक केली.
अनिल देशमुखांना दिलासा नाहीच, मुंबई उच्च न्यायालयाने केली अडचणीत वाढ
या पार्श्वभूमीवर आता, राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळेंनी केंद्र सरकारवर जळजळीत टीका केली आहे. “आमच्यावर यशवंतराव चव्हाणांचे संस्कार आहेत, मात्र केंद्र सरकारकडून दडपशाहीने केंद्रीय यंत्रणांवर दबाव टाकला जात असून, राज्यातील वातावरण बिघडवले जात आहे. महिला घरात असताना, घरात घुसून त्यांच्या जावयावर कारवाई करण्यात आली, हे चुकीचं आहे. या प्रकाराला राज्याच्या राजकारणात, समाजकारणात कधीच जागा नव्हती,” असं त्या म्हणाल्या.
CBIचा अहवाल फोडल्याने अनिल देशमुखांच्या जावलयाला अटक; गौरव चतुर्वेदीची वीस मिनिटे चौकशी
तसेच, “महाविकास आघाडी सरकारचे काम पाहून, लोकांमध्ये महाविकास आघाडीबद्दल असणारं प्रेम, गेल्या दीड वर्षात वाढलेलं आहे, लोकप्रियता वाढत चालली आहे. माध्यमांचे सर्व्हे देखील आमच्या बाजूने आहेत. त्यामुळे, विरोधी पक्षाला अजून काही विषय नसल्यामुळे त्यांच्याकडून सत्तेचा गैरवापर केला जात आहे. याआधी अशी दडपशाही मी पाहिली नव्हती. सरकारी यंत्रणा केंद्राच्या नियंत्रणात असताना, माहिती लीक कशी केली जाते? हे सुडाचं राजकारण टिकणारं नाही, हे दुर्दैवी आहे,” अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
खडसेंच्या सह आणखी ३ जणांची नावे चर्चेत, कुणाचा पत्ता कट होणार? मुख्यमंत्री राज्यपालांच्या भेटीला
दरम्यान, काही दिवसांपूर्वी सुप्रीम कोर्टाने देशमुखांना दणका दिल्यांनतर आता मुंबई उच्च न्यायालयाने देखील देशमुखांच्या अडचणीत वाढ केली आहे. ईडीच्या कारवाईविरोधात देशमुखांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करत दाद मागितीला होती. मात्र, उच्च न्यायालयाने मनी लॉड्रिंग आणि भ्रष्टाचार प्रकरणी ईडीने बजावलेले समन्स रद्द करण्याच्या देशमुखांच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास नकार दिला आहे. त्यामुळे, देशमुखांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
Read Also :
- “उघड दार उद्धवा आता…”; मंदीरे उघडण्यासाठी भाजपच्या शंखनादानंतर मनसेचे घंटानाद आंदोलन
- उद्धव ठाकरेंचा झटका: मंत्रालयातील ३०० ‘पॉवरफुल्ल’ एकाचवेळी अधिकाऱ्यांच्या फेरबदल्या
- 12 आमदारांच्या यादीत राष्ट्रवादीकडून ढवळाढवळ; राजू शेट्टी यांचा केला “करेक्ट कार्यक्रम”
- खडसेंच्या सह आणखी ३ जणांची नावे चर्चेत, कुणाचा पत्ता कट होणार? मुख्यमंत्री राज्यपालांच्या भेटीला
- आगामी निवडणुकीत युती की महाविकास आघाडी? शरद पवारांनी आढावा बैठकीत केले चित्र स्पष्ट