नवी दिल्ली : संसदेच्या अधिवेशनाचा पहिला दिवस होता. अपेक्षेप्रमाणे संसदेचे अधिवेशन पहिल्याच दिवशी चांगलेच गाजले आहे. पहिल्याच दिवशी तब्ब्ल १२ खासदारांचे निलंबन झाल्याने चांगलीच राजकीय उलथापालथ झाली आहे. यावरून विरोधी पक्षातून सत्ताधाऱ्यांच्या विरोधात नाराजीचा सूर उमटण्यास सुरुवात झाली आहे.
संसदेच्या अधिवेशनात गोंधळ: १२ खासदारांच निलबंन, शिवसेनेच्या दोन खासदारांचा समावेश
पहिल्याच दिवशी तब्बल १२ खासदारांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. याबाबत खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया देत हे सारं राज्य सरकारने आधीच ठरवून केलं आहे. उत्तर प्रदेशांत आगामी निवडणूकांबाबत केलेल्या सर्व्हेमुळे भारतीय जनता पक्ष कमालीचा निराश झाल्याने अशाप्रकारे निलंबन करण्यात आल्याचंही त्या म्हणाल्या. निलंबित झालेल्या खासदारांमध्ये महाराष्ट्रातील दोन खासदार आहेत. यामध्ये शिवसेनेच्या खासदार प्रियांका चतुर्वेदी आणि अनिल देसाई यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे ही कारवाई मागील अधिवेशन सत्र काळातील आहे. त्यामुळे निलंबित खासदारांना संसदेच्या हिवाळी अधिवेशनात सहभागी होता येणार नाही.
सुप्रिया सुळेंनी भाजपवर निलंबनानंतर सडकून टीका केली आहे. मागच्या वेळेलाही केंद्र सरकारकडून असाच रडीचा डाव खेळण्यात आला होता. सरकारकडे सध्या स्पष्ट बहुमत आहे. याच बहुमताच्या जोरावर मागच्या वेळेसही विरोधी पक्षाला विश्वासात न घेता ठराव मंजूर करून घेण्यात आले होते. एवढंच नाही तर शेतकरी आंदोलनाबाबतही सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली. हे सरकार स्वतःला हवं तेच खोटं बोलून रेटून करत आहेत. तसंच शेतकरी आंदोलनाची परिस्थिती म्हणजे देशात इमर्जन्सीच (आणीबाणी) आहे. फक्त याला तसं नाव दिलेलं नाही, असंही त्या म्हणाल्या.
निलंबित झालेले खासदार
इलामाराम करीम (मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष), फुलो देवी नेताम (काँग्रेस), छाया वर्मा (काँग्रेस), , रिपुन बोरा (काँग्रेस), , बिनॉय विश्वम (भारतीय कम्युनिस्ट पक्ष), राजमणी पटेल (काँग्रेस), , डोला सेन (काँग्रेस), , शांता छेत्री (काँग्रेस), , सय्यद नासिर हुसेन (काँग्रेस) , प्रियांका चतुर्वेदी (शिवसेना), अनिल देसाई (शिवसेना) आणि अखिलेश प्रसाद सिंग (काँग्रेस)
Read Also :
- 12 खासदार निलंबन प्रकरणी संसदेत गदारोळ, लोकसभा आणि राज्यसभेत विरोधकांचा सभात्याग
- “उद्धव ठाकरेंनी सत्तेपोटी भगवा सोडला, हिरवा हातात घेतला”; सोमय्यांची घणाघाती टीका
- महाराष्ट्राच्या राजकारणात ट्विस्ट?; ममता बॅनर्जी आजपासून तीन दिवसीय दौऱ्यावर…
- कोल्हापूर जिल्हा बँकेसाठी दिग्ग्ज मंत्री मैदानात ; पुन्हा एकदा धावणार समझोता एक्सप्रेस?
- कसई दोडामार्ग नगरपंचायत निवडणुकीकडे लागले सर्व राजकीय पक्षांचे लक्ष