मुंबई : प्रतापगडाच्या पायथ्याखाली असलेली अफजल खानाची कबरीच्या आजुबाजूला असलेलं अनधिकृत बांधकाम तोडण्याचं काम सुरू आहे. त्यामुळे सध्या प्रतापगड परिसरात राज्य सरकारने 144 कलम लावले आहेत. यासाठी चार जिल्ह्यातील तब्बल 1500 पोलिसांचा ताफा तैनात कऱण्यात आला आहे. यातच आता अफजल खानची कबर देखील उखडून टाका अशी मागणी होत असताना जितेंद्र आव्हाडांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
“मोदींनी राहुल गांधीच्या पदयात्रेत सहभागी व्हावं..”; राजू शेट्टींचा खोचक टोला
अफजल खानाची कबर जिजामातेच्या आदेशाने शिवाजी महाराजांनी बांधलीय. आता वैर संपलं असं जिजाऊंनी म्हटलं होतं. त्यानंतर ही कबर बांधलीय. इतिहासाचं विकृतीकरण करू नका हे आमचं म्हणणं आहे. जेव्हा जेव्हा लोकांना फसवायचं असतं. दिशाभूल करायची असते तेव्हा तुम्हाला धार्मिक आणि इतिहास हेच दोन आधार आहेत. त्यामुळे लोकांची डोकी फिरतात. असं राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे.
औरंगजेब, अफजलखानाच्या कबरी सरकारने तात्काळ काढून टाकाव्या अन्यथा..;” हिंदू महासभेचा इशारा
तसेच पुढे बोलताना ते म्हणाले की, मराठ्याचे शौर्य आहे हे कुणी नाकारून चालणार नाही. मराठ्याच्या नेतृत्वात सगळ्या जातीधर्माचे लोक एकत्र लढले. मावळा म्हटलं तर रांगट, चेहऱ्यावर मिशा असलेला त्याऐवजी बायल्या, केस मागे असलेला राक्षस दिसतात. ऐतिहासिक चित्र तुमच्या नजरेत बसलेले असते. त्या प्रतिमा वेड्यावाकड्या दाखवू शकत नाही. सिनेमॅटिक लिबर्टिच्या नावाखाली काहीही दाखवू शकत नाही. असा इशारा देखील जितेंद्र आव्हाडांनी दिला आहे.
“येळकोट येळकोट जय मल्हार..!” अन् आदित्य ठाकरेंनी उचलली तलवार
दरम्यान, यावर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील आपली प्रतिक्रिया दिली आहे. आजचा दिवस आपल्यासाठी अभिमानाचा आहे. आजच्या दिवशी अफजल खानाचा वध झाला होता. 2017 साली कोर्टानं या अफजल खानच्या थडग्याजवळ असलेले अनधिकृत बांधकाम काढले पाहिजे अशी नोटीस दिली होती. 2017 मध्ये आम्ही कारवाई सुरू केली होती. परंतु त्यात पुन्हा कायदेशीर अचडणी आल्या. आता या सर्व अडचणी दुर झाल्या असून सातत्याने शिवप्रेमींची मागणी होती, की त्याठिकाणचं बांधकाम तोडावं. शिवप्रेमींवर गुन्हे दाखल झाले. परंतु अतिक्रमण हटवलं नव्हतं. आज सगळ्यांसाठी समाधानाची गोष्ट आहे, कारण त्याठिकाणचं सगळं अतिक्रमण हटवण्यात आले आहे. असंही ते म्हणाले.
Read also
- दिपाली सय्यद यांच्याविरोधात सेनेचं पुण्यात आंदोलन..! शिंदे गटात गेल्या अन्..;
- “शिवप्रेमींवर गुन्हे दाखल झाले पण..;” अफजल खानच्या कबरीवरील कारवाईवर फडणवीसांची प्रतिक्रिया
- “केंद्र सरकार न्यायालयालाच आपल्या बुडाखाली घेण्याचा प्रयत्न करत असेल तर..”; ठाकरेंचा हल्लाबोल
- “कबरी काढून फेका..!” हिंदू महासभेची मागणी, शंभुराज देसाई म्हणाले, “धक्का पोहचू देणार नाही”
- “कबरी काढून फेका..!” हिंदू महासभेची मागणी, शंभुराज देसाई म्हणाले, “धक्का पोहचू देणार नाही”