पुणे : पुण्यात लोकनेते गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाच्या मुख्य कार्यालयाचे उद्धाघटन करण्यात आलं. या कार्यक्रमात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सामाजिक न्यायमंत्री यांनी धनंजय मुंडे यांच्यावर सुतिसुमने उधळली आहेत. तर भाजपला जोरदार टोला देखील लगावला आहे. ऊसतोड कामगारांच्या बाबतीत अनेक वर्षे अभ्यास झाला. पण 20 वर्षे कोणाला काही करता आलं नाही. पण मविआने हे महामंडळ अस्तित्वात आणलं, असे म्हणत त्यांनी भाजपलाही टोला लगावला आहे. तसेच हे लोक किती कष्ट घेतात हे ज्याचं त्याला माहिती. प्रतिकूल परिस्थितीत ही सगळी लोक काबाडकष्ट करतात, त्यातून साखर कारखान्यांना ऊस पुरवतात. ऊसतोड कामगाराचा मुलगा सामाजिक न्यायमंत्री झालाय हे भाग्य आहे. असे भाग्य ठराविक जणांना मिळत. असं अजित पवार म्हणाले आहेत.
काॅंग्रेसने कधीही जातीचं राजकारण केलं नाही; पाटलांच्या वक्तव्यांनी अनेकांच्या भुुवया उंचावल्या
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ऑनलाईन उपस्थितीत लोकनेते गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाच्या मुख्य कार्यालयाचे उद्धाघटन करण्यात आलं. पुणे येथील सामाजिक न्याय भवन परिसर, येरवडा या ठिकाणी उद्घाटन सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, आमदार रोहित पवार हे उपस्थित होते. यावेळी बोलताना अजित पवार यांनी धनंजय मुंडे यांच्यावर स्तुतीसुमने उधळत भाजपला जोरदार फटकारलं आहे.
विरोधकांचा डाव पंतप्रधान इम्रान खाननं उधळून लावला; संसदेत न जाता थेट राष्ट्रपतीची घेतली भेट
दुसरीकडे, साखर कारखान्यांना थेट इशारा दिला आहे. “जर कोणत्या साखर कारखान्याने ऊसतोड कामगारांच्या निधीसाठी टनामागे 10 रुपये दिले नाही, तर पुढच्या वर्षी त्याच्या कारखान्याला ऊस जाणार नाही”, असं म्हणत अजित पवारांनी थेट इशाराच दिला आहे. तर , सरळ देत नसतील तर बोट वाकड करावं लागतं, असा खास अजित दादांच्या स्टाईलमध्ये त्यांनी कारखानदारांना टोला लगावला आहे.
“काल आयुष्यात पहिल्यांदा राजकीय सभा अनुभवली”; राज ठाकरेंच्या भाषणांवर अभिनेत्रीची प्रतिक्रिया
दरम्यान, कारखानदार ऊसतोड कामगारांचा जीवावर मोठे होता आणि त्यांच्यांसाठी टनामागे 10 रुपये द्यायला नाही म्हणता, काही तरी वाटलं पाहिजे, सगळं इथेच सोडून जायचं आहे. असा घणाघात अजित पवार यांनी कारखानदारांवर केला आहे. आता राज्यातील सर्वाधिक कारखानदार ज्या पक्षाचे आहेत त्याच पक्षाच्या सर्वोच्च नेत्याने अशा पद्धतीने फटकारल्यावर कारखानदार नेमकी काय भूमिका घेतात याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.
Read also:
- साहेबांच्या वारसदारांना संधी मिळाली पण..; धनंजय मुंडेंचा पंकजा मुंडेंना टोला
- ” असंतुष्ट आत्मांच्या छाताडावर बसून महापालिका जिंकणार”; संजय राऊतांची भीष्मप्रतिज्ञा
- राज ठाकरेंना हाफचड्डीपासून ओळखतो, हा त्यांचा सिझनेबल कार्यक्रम
- मनसे भाजपची ‘सी’ टीम झाल्याचा आम्हाला आनंद; आदित्य ठाकरेंची मनसेवर खोचक टीका
- वाह रे बहाद्दरांनो, समोर यायची हिंमत नाही अन्..; सभेत दगड फेकणाऱ्यांना चित्रा वाघ यांनी सुनावलं