कोल्हापूर : कोल्हापुर उत्तरचा राजकीय आखाडा आता चांगलाच तापू लागला आहे. भाजप आणि महाविकास आघाडीमध्ये कांटे की टक्कर होत असताना आता एकमेकांवरील चिखलफेक चांगलीच वाढली आहे. आता थेट विरोधी पक्षातील उमेदवाराच्या प्रचारसभेवर दगडफेक झाल्याने संघर्षाची तीव्रता किती आहे हे लक्षात येत आहे.
भाजपचे उमेदवार सत्यजित कदम यांच्या प्रचारानिमित्त काल भाजपच्या महिला प्रदेश अध्यक्ष चित्रा वाघ या कोल्हापुरात आल्या होत्या. सकाळी चित्रा वाघ यांच्या उपस्थितीमध्ये कोल्हापूरातील मिरजकर तिकटीहुन मोठी रॅली काढण्यात आली होती. या रॅलीला महिलांचा विशेष सहभाग होता. शुक्रवार पेठेतील ‘मिसळ पे चर्चा’ हा कार्यक्र्म देखील घेण्यात आला होता. भाजपचे नगरसेवक किरण शिरोळे यांनी सत्यजित कदम यांच्या प्रचारार्थ हा कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी चित्रा वाघ आणि अरुंधती वहिनी यांनी यांनी जनतेला सत्यजित कदम यांना निवडून देण्याचे आव्हान दिले.
पवार साहेबांचं नाव घेतल्याशिवाय हेडलाईन बनत नाही; सुप्रिया सुळेंचा राज ठाकरेंना टोला
संध्याकाळच्या सुमारास कोल्हापूर उत्तरेत चित्रा वाघ यांच्या उपस्थितीमध्ये मोठ्या प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेला मात्र गालबोट लागले. अज्ञातांनी या सभेवर जोरदार दगडफेक केली आणि सभा उधळून लावण्याचा प्रयत्न केला. या सर्व प्रकारानंतर चित्रा वाघ यांनी ट्विटरच्या माध्यमातून विरोधकांवर टीका केली आहे.
भुजबळ, पिचड, अरूण गुजराथी हे कोणते नेते मग? राज ठाकरेंच्या जातीयवादाच्या टिकेला पवारांचं प्रत्युत्तर
वाह रे बहाद्दरांनो, समोर यायची हिंमत नाही तर सभेत दगडं मारतां…तुमची दहशत गुंड बलात्कार्यांवर दाखवा…असल्या थेरांना घाबरणारी चित्रा वाघ नाही हे लक्षातचं ठेवा असा संतप्त इशारा चित्रा वाघ यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिला आहे. भाजपचा उमेदवार आता जड जात असल्याने असली थेरं तुम्हाला सुचत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
Read also:
- काॅंग्रेसने कधीही जातीचं राजकारण केलं नाही; पाटलांच्या वक्तव्यांनी अनेकांच्या भुुवया उंचावल्या
- विरोधकांचा डाव पंतप्रधान इम्रान खाननं उधळून लावला; संसदेत न जाता थेट राष्ट्रपतीची घेतली भेट
- “काल आयुष्यात पहिल्यांदा राजकीय सभा अनुभवली”; राज ठाकरेंच्या भाषणांवर अभिनेत्रीची प्रतिक्रिया
- व्वा रं पठ्ठा…,काय बोलावं आता? अजित पवारांकडून खास दादा स्टाईलने राज ठाकरेंना प्रत्युत्तर
- “मोरी तुंबली आहे वाटलं, काही तरी निघेल, पण भाजपचं गांडूळ निघालं”;