इंदापुर : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईच्या शिवाजी पार्क मैदानावरून सर्वच पक्षांवर जोरदार हल्ला चढवला आहे. राज्यात राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या जन्मानंतर जातीयवाद फोफवला असल्याचा आरोप राज ठाकरे यांनी शरद पवार यांच्यावर केला. अशातच आता राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी राज ठाकरे यांच्या भाषणांवरून त्यांचा चिमटा काढला आहे. त्यावेळी त्या इंदापूर मध्ये बोलत होत्या.
“गांधी, नेहरूंचा आदर सन्मान करण्याऐवजी, त्यांच्यावर टिका टिप्पणी केली जातेय”; शरद पवारांची खंत
राज ठाकरे सध्या विरोधीपक्ष नेते आहेत. त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर टिका करणे साहजिकच आहे. एरव्ही लाव रे तो व्हिडीओ म्हणणारे एका नोटीसाने इतके बदलतील यांच मला कौतुक आणि आश्चर्य वाचत. महाराष्ट्रात राष्ट्रवादी पक्षाच्या निर्मितीनंतर जाती-पातीच्या राजकारणाला सुरूवात झाली. ते या गोष्टी आधीही बोलले आहेत. पवार साहेब गेली 55 महाराष्ट्राच्या राजकारणात कार्यरत आहेत. त्याचे नाव घेतल्याशिवाय हेडलाईन बनत नाही. त्यांच्या पक्षासाठी याची गरज आहे. असंही त्या म्हणाल्या.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारकाचे शरद पवारांच्या हस्ते उद्घाटन! अनेक नेते उपस्थित
त्या पुढे बोलताना म्हणाल्या की, विकासावर त्यांना बोलण्यासारखे काहीच राहिले नाही. कारण मागील दोन- अडीच वर्षात महाविकास आघाडी सरकारने इतकं उत्तम काम केलं आहे त्यामुळे विकासाला विरोध करण्यासारखं काहीच राहिलं नाही. त्यामुळे भावनिक विषय़ांवर बोलून राजकारण सुरू आहे. मात्र हे राजकारण देशाच्या आणि राज्याच्या हिताचं नाही असंही त्यांनी यावेळी मत व्यक्त केलं.
राज्यात पॉलिटिकल प्रदूषण वाढलंय का? आदित्य ठाकरेंचं भन्नाट उत्तर
दरम्यान, 1999 मध्ये ज्यावेळी राष्ट्रवादी काॅंग्रेसचा जन्म झाला तेव्हा पासून जातीचं राजकारण सुरू झालं. राष्ट्रवादीला जातीयवाद हवा आहे, आणि त्यानंतरच जातीवाद वाढला आहे. ही गोष्ट शरद पवारांना माहिती आहे. त्याचबरोबर नवाब मलिक तुरूंगात जाऊनही सत्तेत आहे. बदल हवा असेल तर हे चालणार नाही. रयतेच्या भाजीच्या देठालाही हात लागू नये असा कारभार असावा. असा टोला देखील राज ठाकरे यांनी लगावला.
Read also:
- भुजबळ, पिचड, अरूण गुजराथी हे कोणते नेते मग? राज ठाकरेंच्या जातीयवादाच्या टिकेला पवारांचं प्रत्युत्तर
- राष्ट्रवादीमुळे जातीयवाद फोफावलाय; राज ठाकरेंचा शरद पवारांंवर निशाणा
- “निवडणुकीनंतर सेना प्रमुखांना अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद आठवलं, आधी झोपले होते का?”
- मुख्यमंत्री, गृहमंत्रीपदाच्या बातम्यांवर अजित पवारांची प्रतिक्रिया; म्हणाले, मला तर..;
- भाजपला सांगलीत मोठा धक्का! भाजपच्या माजी मंत्र्यांचा राष्ट्रवादी काॅंग्रेसमध्ये प्रवेश