मुंबई : गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीतील अनेक मंत्र्यांवर भ्रष्टाचारांच्या मुद्यांवर पोलिसांनी कारवाई केली आहे. मात्र भाजप नेत्यांविरोधात पुरावे देऊनही त्यांच्यावर कारवाई नसल्याची धुसफुस राष्ट्रवादी काॅंग्रेस आणि शिवसेनेत सुरू होती. त्याचबरोबर राष्ट्रवादीकडे गृहखाते शिवसेेनेला देण्याची मागणी केल्यांचं बोलण्यात येत होतं. त्याच पद्धतीच्या बातम्या देखील प्रसार माध्यमांमध्ये फिरत होत्या. त्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. याच पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी देखील यावर स्पष्टीकरण दिलं. ते मुंबई येथील मेट्रो प्रकल्पांच्या उद्घाटन सोहळ्यासाठी आले होते.
काॅंग्रेसचे ते २५ आमदार दिल्लीत प्रशिक्षण घेणार; नाराज नसल्याचं काॅंग्रेसच्याच नेत्यांनी सांगितलं
शिवसेना आणि राष्ट्रवादी काॅंग्रेसमध्ये गृहमंत्र्याबाबात खरचं चर्चा सुरू आहे का? असा सवाल त्यांना विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले की, तसं काहीही नाही. आम्हालाच आश्चार्य वाटत आहे की, अशा बातम्या कोण देत आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही स्पष्टीकरण दिलं आहे. मला शिवसेना आणि राष्ट्रवादी काॅंग्रेसमध्ये नाराजी कुठेच दिसत नाही. मी रोज कामात असतो. परंतु मला अजूनही नाराजी असल्याचं कुठेही जाणवलं नसल्याचंही त्यांनी म्हटलं.
पंच प्रभाकर साईलचा मृत्यू संशयास्पद! वळसे पाटलांनी दिले चौकशी करण्याचे आदेश
त्याचबरोबर दिलीप वळसे पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वर्षा येथील त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. त्यावर बोलताना त्यांनी सांगितलं की, अशा नेत्यांच्या भेटी होत राहतील. काही प्रश्न समस्या सोडवण्यासाठी या चर्चा होत असतात असंही त्यांनी सांगितलं आहे.
मराठी माणसाच्या भाषेवरून अजित पवारांची चौफेर टोलेबाजी; मुख्यमंत्र्यांसमोरच सांगितला किस्सा
दरम्यान, शिवसेना आणि राष्ट्रवादी काॅंग्रेसमध्ये गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्यांच्या अदलाबदलीची शक्यता वर्तवली जात होती. गृहखातं भाजपबाबत मवाळ असलेल्या सेना अस्वस्थ, काॅंग्रेसच्या नेत्यांवरही कारवाई झाल्याने ते देखील नाराज असल्याची माहिती समजत होती. भाजपचे नेते, नारायण राणे, प्रसाद लाड, किरीट सोमय्या, नितेश राणे, मोहित कंबोज या सगळ्यांबाबात कारवाया करताना पोलिसांनी कारवाई सुमार राहिल्याची काही नेत्यांनी टिका केली होती.
Read also:
- भाजपला सांगलीत मोठा धक्का! भाजपच्या माजी मंत्र्यांचा राष्ट्रवादी काॅंग्रेसमध्ये प्रवेश
- “गांधी, नेहरूंचा आदर सन्मान करण्याऐवजी, त्यांच्यावर टिका टिप्पणी केली जातेय”; शरद पवारांची खंत
- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारकाचे शरद पवारांच्या हस्ते उद्घाटन! अनेक नेते उपस्थित
- राज्यात पॉलिटिकल प्रदूषण वाढलंय का? आदित्य ठाकरेंचं भन्नाट उत्तर
- “भाजपमुळे देशात जनता रोज एप्रिल फुलमध्ये जगतेय” नाना पटोलेंची मिश्कील टीका