अहमदनगर : राज्यात अलिकडेच विकास निधीवरून शिवसेना आणि काॅंग्रेसचे काही आमदार नाराज असल्याच्या बातम्या येत होत्या. तसेच याच संदर्भात काॅंग्रेसचे २५ आमदार काॅंग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेणार असल्याचंही बोलण्यात येत होतं. मात्र एका कार्यक्रमात बोलताना श्रीरामपूरचे काॅंग्रेसचे आमदार लहू कानडे यांनी या विषयावर भाष्य करत या विषायाला बगल दिली आहे.
सरकार पाडण्याच्या गुढ्या मनात उभारणाऱ्यांना चोख उत्तर; मुख्यमंत्र्यांचा भाजपला टोला
लहू कानडे यांनी सांगितलं की, आमदारांकरीत संसदेच्या पार्लमेंटरी रिसर्च अॅंड ट्रेनिंग इन्स्टिट्युट फॉर डेमाॅक्रसीस या संस्थेमार्फत दिल्ली येथे ५ व ६ एप्रिल प्रशिक्षण आयोजित करण्यात आलं आहे. यासाठी राज्यातील २५ व एकूण ११९ सदस्य या प्रशिक्षणात सहभागी होणार आहेत. त्यामुळे काॅंग्रेसच्या दिल्लीला जाणार असणाऱ्या फक्त अफवा होत्या . वास्तविक माझ्या मतदारसंघात ३०० कोटींची विकास कामे सुरू असल्याचंही त्यांनी सांगितलं.
तर चंद्रकांत पाटील ऑफर का घेऊन आले मग ? मुन्ना महाडिकांना जयश्री जाधवांचे तिखट उत्तर
राज्यातील इतर आमदारांच्याही मतदारसंघात मोठ्या प्रमाणात निधी मिळालेला आहे. त्यामुळे नाराजी असण्याचा कोणताही प्रश्न नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. त्याचबरोबर हे आमदार दिल्लीत सोनिया गांधी यांची भेट घेतीलच परंतु मुलायमसिंह यादवांची भेट घेणार का ? असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला आहे.
कोल्हापुरात भाजपचं वजन वाढलं; एसटी संघटना, हिंदू एकता आंदोलन समितीचा भाजपला पाठींबा
दरम्यान, विकास निधीवरून राज्यातील इतर आमदार नाराज असल्याचंही सांगण्यात येत आहे. अलिकडेच सोलापूरात शिवसेनेचे नेत तानाजी सावंत देखील निधीवरून राष्ट्रवादी काॅंग्रेसवर निशाणा साधला होता. तर इतर शिवसेनेतील आमदारांनी देखील नाराजी दर्शवली असल्याचं चित्र दिसत होतं.
Read also:
- पंच प्रभाकर साईलचा मृत्यू संशयास्पद! वळसे पाटलांनी दिले चौकशी करण्याचे आदेश
- मराठी माणसाच्या भाषेवरून अजित पवारांची चौफेर टोलेबाजी; मुख्यमंत्र्यांसमोरच सांगितला किस्सा
- काॅंग्रेसच्या नेत्यांनं आव्हांडासमोर बांधलं हाताला घड्याळ; अन् काॅंग्रेसच्या आमदारांनं काढला पळ
- पार्थ पवार कोरेगावच्या राजकारणात? “वेल कम टु कोरेगाव” म्हणत शिवसेना नेत्याचं आव्हान
- साईलचा मनसुख हिरेन तर करण्यात आलेला नाही ना? भाजपचा राज्य सरकारला सवाल