जळगाव : महाविकास आघाडी सरकारमध्ये सारं काही अलबेल नाही हे वारंवार राज्यातील वेगवेगळ्या घटनांमधून समोर आलं. राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, काँग्रेस या तिन्ही पक्षांमधली धुसपूस आता प्रखरतेने समोर येऊ लागलीय. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जेव्हा अधिवेशनात पेनड्राइव्ह बॉम्ब फोडला तेव्हा त्याला गृहमंत्र्यांनी तात्पुरता विरोध केला आणि नंतर त्या आरोपांकडे ढुंकूनही पाहिले नाही. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे कमालीचे नाराज झाल्याच्या बातम्या समोर येत होत्या.
मोठी बातमी ! आर्यन खान प्रकरणातील मुख्य साक्षीदार प्रभाकर साईलंच निधन
त्यावर शिवसेना नेते भाजपला आक्रमकतेने उत्तर देत असताना काँग्रेस आणि राष्ट्रवादीची बोटचेपी भूमिका आम्हाला अडचणीत आणत असल्याचंही उद्धव ठाकरेंनी शरद पवारांना बोलूनही दाखवलं. या सर्व प्रकारानंतर महाविकास आघाडीमध्ये चांगलीच धुसपूस सुरु आहे हे सर्वांनाच कळलं आहे. त्यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जळगाव दौऱ्यावर असतानाच काॅंग्रेसच्या नेत्यांनी काॅंग्रेसच्या आमदारांसमोरच हातावर घड्याळ बांधल्याच्या चर्चा सध्या रंगू लागल्या आहेत.
देशाला ३४ वर्षानंतर मोदींनी नवीन शैक्षणिक धोरण दिलं; विखे पाटलांकडून मोदींचं कौतुक
जितेंद्र आव्हाड हे जळगाव दौर्यावर गेले होते. या दौऱ्यात राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये दरी वाढण्याचे काम झाले असं बोललं जातंय. त्यावेळी झालं असं की, काँग्रेसचे आमदार शिरीष चौधरी यांची उपस्थिती असताना काँग्रेसच्या माजी नगरसेवकाने राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. त्यानंतर या नगरसेवकाला राष्ट्रवादीकडून विधानसभा क्षेत्र प्रमुख म्हणून जबाबदारीही देण्यात आली. काँग्रेस पक्षाच्या स्थानिक आमदाराच्या समोरच पक्षातील नगरसेवकाने राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने काँग्रेसचे कार्यकर्ते नाराज झाले. हे सर्व पाहून आमदार गिरीश चौधरी यांनी बाहेरचा रस्ता पकडत स्टेजला सोडचिठी दिली. त्याचबरोबर त्याठिकाणी काँग्रेस कार्यकर्त्यांनी काँग्रेसच्या आमदाराच्या समोरच राष्ट्रवादीचे ‘घड्याळ’ हाती बांधल्याने जळगाव जिल्ह्यात मोठी चर्चा रंगली.
काळजी करू नका, सुधारणेला वाव असेल तर सुधारणा करू! वळसे पाटलांचा राऊतांना शब्द
महाविकास आघाडीत सातत्याने अशा नाराजी नाट्यांमुळे तीनही पक्षांना नुकसानाला सामोरे जावे लागलेय. आगामी काळात महानगरपालिका आणि नंतर लोकसभेची निवडणूक आहे. आत्ताच जर महाविकास आघाडीत अलबेल नसेल तर उद्या जाऊन तिकीट वाटपावेळी काय हाल होऊ शकतात हे तर देव जाणे. जर आता हे तीनही पक्ष एकसंघ झाले नाही तर पुढील काळात मोठ्या नुकसानाला या तीनही पक्षांना सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. आता होणाऱ्या महानगरपालिका निवडणुकींमध्येच महाविकास आघाडी सरकारला भविष्य आहे का नाही ? हे जनता ठरवणार आहे. त्यामुळे आता सर्वांचे लक्ष जनतेच्या निर्णयाकडे लागून आहे.
Read also:
- पार्थ पवार कोरेगावच्या राजकारणात? “वेल कम टु कोरेगाव” म्हणत शिवसेना नेत्याचं आव्हान
- साईलचा मनसुख हिरेन तर करण्यात आलेला नाही ना? भाजपचा राज्य सरकारला सवाल
- सरकार पाडण्याच्या गुढ्या मनात उभारणाऱ्यांना चोख उत्तर; मुख्यमंत्र्यांचा भाजपला टोला
- तर चंद्रकांत पाटील ऑफर का घेऊन आले मग ? मुन्ना महाडिकांना जयश्री जाधवांचे तिखट उत्तर
- कोल्हापुरात भाजपचं वजन वाढलं; एसटी संघटना, हिंदू एकता आंदोलन समितीचा भाजपला पाठींबा