मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यात महाविकास आघाडी विरूद्ध भाजप असा जोरदार राजकीय संघर्ष सुरू आहे. दोन्ही बाजूंनी आरोपांच्या जोरदार फैरी झाडल्या जात आहे. त्याचबरोबर लवकरच सरकार पडणार असल्याचंही वक्तव्य भाजपकडून सातत्याने केलं जात आहे. आज गुडीपाडव्याच्या दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हस्ते डाळा येथील वस्तू आणि सेवा कर भवनाच्या इमारतीचं ऑनलाईन भूमिपूजन केलं त्यावेळी त्यांनी भाजपवर जोरदार प्रहार केला.
राष्ट्रवादी काॅंग्रेस हा स्वार्थी पक्ष असून तो सत्तेसाठी..; चंद्रकांत पाटलांचा राष्ट्रवादीवर निशाणा
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, आपल्यातील रूसवा फुगवा, कटुता निर्माण व्हावी अशा काही लोक मनातल्या मनात गुढ्या उभारत आहेत. कारण त्यांना दुसरा कोणताही उद्योग नाही. कामाच्या गुढ्या उभारू ते शकत नाहीत. मग सरकार पाडण्याच्या गुढ्या मनातल्या मनात उभारत असतात. त्याला आपण हे दिलेलं आपल्या कृतीतील चोख उत्तर आहे.
फडणवीसांकडे अहमदनगर, सोलापुरची जबाबदारी; रोहित पवारांचा शिंदे, विखेंना चिमटा
राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये कुणाच्याही मनात भेदभाव नाही. त्याचबरोबर यात सरकारमध्ये कोणतेही रूसवे फुगवे नाहीत. ही आघाडी जमीनीवर राहुन विकासाचे नियोजनबद्ध काम करत आहे. अनेकदा काही जण घोषणा करून नारळ फोडतात परंतु यातून फक्त नारळ विक्री वाढते. आपलं तसं नाही. आज आपण प्रत्यक्ष काम सुरू करत आहोत. हा महत्वाचा फरक आहे. हे काम बघितल्यावर आपल्यात कटुता निर्माण करणाऱ्यांना नक्की उत्तर मिळेल. सरकार पाडण्यासाठी प्रयत्न करणाऱ्यांना आपल्या कृतीतून आपण उत्तर दिलं असल्याचंही यावेळी त्यांनी सांगितलं आहे.
मुख्यमंत्रीपद असताना गृहमंत्रीपद मागणे, म्हणजे नाचता येईना अंगण वाकडे! मुनगंटीवारांचा टोला
दरम्यान, मागील काही घटनांवरून असं लक्षात येत की काही जण महाराष्ट्राची बदनामी करीत आहेत. त्या लोकांना मला सांगायचं आहे की, महाराष्ट्रातून इतकं मोठ्या प्रमाणात देशाला आर्थिक हातभार लागला नसता तर देशाच्या अर्थव्यवस्थेला धक्का बसला असता. असंही ते म्हणालेत. सर्वाधिक कर संकलनांच्या बाबत देशात महाराष्ट्र अव्वल आहे. महाराष्ट्राने देशाला कराच्या रूपात सर्वाधिक हातभार लावला आहे.
Read also:
- तर चंद्रकांत पाटील ऑफर का घेऊन आले मग ? मुन्ना महाडिकांना जयश्री जाधवांचे तिखट उत्तर
- कोल्हापुरात भाजपचं वजन वाढलं; एसटी संघटना, हिंदू एकता आंदोलन समितीचा भाजपला पाठींबा
- मोठी बातमी ! आर्यन खान प्रकरणातील मुख्य साक्षीदार प्रभाकर साईलंच निधन
- देशाला ३४ वर्षानंतर मोदींनी नवीन शैक्षणिक धोरण दिलं; विखे पाटलांकडून मोदींचं कौतुक
- काळजी करू नका, सुधारणेला वाव असेल तर सुधारणा करू! वळसे पाटलांचा राऊतांना शब्द