अहमदनगर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ३४ वर्षानंतर देशाला नवीन शैक्षणिक धोरण दिलं असं वक्तव्य भाजपचे नेते आणि आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलं. लोकनेते पद्मभुषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेची सहविचार सभा त्यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली त्यावेळी ते बोलत होते.
गृहमंत्र्यांवर मुख्यमंत्री नाराज असणाऱ्या बातम्यांचं मुख्यमंत्र्यांकडून खंडण; म्हणाले..;
विखे पाटील पुढे म्हणाले की, गुणवत्तापूर्ण शिक्षणाबरोबरच नवीन तंत्रज्ञानाने मूलभूत पाया विकसीत करावा लागेल. भविष्यात परदेशी विद्यापीठांशीच आपली स्पर्धा असून यासाठी नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा विचार कृतीत उतरवूनच शैक्षणिक संस्थांना मार्गक्रमण करावे लागेल, इंग्रजी भाषेचा आग्रह पद्दश्रींनी १९६४ सालीच धरला. अतिशय दुरदृष्टीने त्यांनी मानलेला विचार आज सर्वानिच स्वीकारला आहे.
सर्वोच्च न्यायालयाचा राज्य सरकारला पुन्हा दणका! अनिल देशमुखांच्या संबंधित याचिका फेटाळली
केंद्र सरकारने अलिकडेच नवीन शैक्षणिक धोरण देशात सुरू केलं आहे. यावरून बोलताना त्यांनी नरेंद्र मोदींचा उल्लेख केला. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ३४ वर्षानंतर या देशाला नवे शैक्षणिक धोरण दिले. या धोरणामध्येच प्रत्येक व्यक्तीच्या क्षमतांचा विकास करण्याचा अंतर्भूत विचार केला आहे. त्या दृष्टीने आता बदललेली शैक्षणिक रचना गृहित धरून गुणात्मक शिक्षणाबरोबरच कौशल्यपूर्ण शिक्षणाची जबाबदारी आपल्या सर्वांवर येऊन पडली आहे. अंसही ते म्हणालेत.
ऑनलाईन शिक्षणात हजारो अडथळ्यांमुळे अभ्यासावर लक्ष कसं केंद्रीत करावं? मोदींनी सांगितला जबरदस्त उपाय
दरम्यान, या कार्यक्रमाला माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील, संस्थेचे नवनियुक्त संचालक, निवृत्त सनदी अधिकारी शिवाजीराव जोंधळे, अण्णासाहेब भोसले, डॉ. भास्करराव खर्डे, शांतिनाथ आहेर, दत्त पाटील शिरसाठ, मच्छिंद्र पावडे, भाऊसाहेब जऱ्हाड, रोहिणी निघुते, अॅड पोपटराव वाणी, किशोर नावंदर, संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शिवानंद हिरेमठ, शिक्षण अधिकारी लिलावती सरोदे आदि उपस्थित होते.
Read also:
- काळजी करू नका, सुधारणेला वाव असेल तर सुधारणा करू! वळसे पाटलांचा राऊतांना शब्द
- राष्ट्रवादी काॅंग्रेस हा स्वार्थी पक्ष असून तो सत्तेसाठी..; चंद्रकांत पाटलांचा राष्ट्रवादीवर निशाणा
- फडणवीसांकडे अहमदनगर, सोलापुरची जबाबदारी; रोहित पवारांचा शिंदे, विखेंना चिमटा
- मुख्यमंत्रीपद असताना गृहमंत्रीपद मागणे, म्हणजे नाचता येईना अंगण वाकडे! मुनगंटीवारांचा टोला
- गृहखात्यालाच दमदार पावलं टाकावी लागेल, नाही तर तुमच्यासाठी रोज नवा खड्डा: संजय राऊत