मुंबई : राज्यात सध्या मुख्यमंत्रीपद आणि गृहमंत्र्यांच्या मुद्यावरून राजकारण तापलं आहे. गृहमंत्र्यांकडून भाजप नेत्यांविरोधात कारवाई होत नसल्याचा आरोप शिवसेनेने केलाय. त्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. तसेच संजय राऊतांनी देखील गृहमंत्रालयाला वेळीच भूमिका घ्यायाच सल्ला दिला. आता यावर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी त्यावर राऊतांना शब्द दिलाय.
सर्वोच्च न्यायालयाचा राज्य सरकारला पुन्हा दणका! अनिल देशमुखांच्या संबंधित याचिका फेटाळली
भाजप नेत्यांविरोधात कारवाई करताना गृहमंत्र्यांची भूमिका ही सौम्य असते, असा सुर शिवसेनेकडून मिळत आहे. त्यावर दिलीप वळसे पाटील म्हणाले की, कोणतीही कारवाई करताना ती न्यायालयात टिकली पाहिजे. हाच निकष असतो. त्यात भूमिका स्पॉफ्ट आणि हार्ड हा विषय नसतो. त्यामुळे काळजीचं कारण नाही. सुधारणेला वाव असेल तर त्यात जरूर सुधारणा करू असं दिलीप वळसे पाटलांनी संजय राऊतांना म्हटलं आहे.
ऑनलाईन शिक्षणात हजारो अडथळ्यांमुळे अभ्यासावर लक्ष कसं केंद्रीत करावं? मोदींनी सांगितला जबरदस्त उपाय
आता याच मुद्दयावर चंद्रकांत पाटिल राष्ट्रवादी काॅंग्रेसवर बोलतांना म्हणाले की, राष्ट्रवादी पक्ष हा महाविकास आघाडीचा रिमोट आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांना आपण गृहखाते तुमच्याकडे ठेवा अशी विनंती केली होती. हे खाते दिल्यास राष्ट्रवादीचे नेते मातोश्रींवर कॅमेरे लावतील, असा इशारा देखील त्यांनी दिला. तसेच पुढे बोलताना ते म्हणाले की, परंतु मुख्यमंत्र्यांनी हा सल्ला मानला नाही. आता नव्याने सल्ला देण्याची वेळ निघून गेली असल्याचंही ते म्हणालेत.
केंद्रीय अतिरेकी तपास यंत्रणांना घुसवलं जातंय; राऊतांचा भाजपवर गंभीर आरोप
राष्ट्रवादी काॅंग्रेस हा स्वार्थी पक्ष असून तो सत्तेसाठी कोणालाही सोबत घ्यायला तयार असतो. त्यामुळे भूमिका बदलणारा हा पक्ष दगा देणारा आहे, असा टोला देखील चंद्रकांत पाटलांनी राष्ट्रवादी काॅंग्रेसला लावला. सांगलीतील अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकाच्या उद्घाटनास देवेंद्र फडणवीस यांना निमंत्रण दिलं नाही. मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण, कोरोना संकटावेळी त्यांच्याशी चर्चा करून काही निर्णय घेतले असते तर मार्ग निघाला असता. परंतु आघाडीतील नेते फार छोट्या मनाची असल्यामुळे लोकहिताचे निर्णय झाले नाही. अशीही टिका त्यांनी केली.
Read also:
- राष्ट्रवादी काॅंग्रेस हा स्वार्थी पक्ष असून तो सत्तेसाठी..; चंद्रकांत पाटलांचा राष्ट्रवादीवर निशाणा
- फडणवीसांकडे अहमदनगर, सोलापुरची जबाबदारी; रोहित पवारांचा शिंदे, विखेंना चिमटा
- मुख्यमंत्रीपद असताना गृहमंत्रीपद मागणे, म्हणजे नाचता येईना अंगण वाकडे! मुनगंटीवारांचा टोला
- गृहखात्यालाच दमदार पावलं टाकावी लागेल, नाही तर तुमच्यासाठी रोज नवा खड्डा: संजय राऊत
- गृहमंत्र्यांवर मुख्यमंत्री नाराज असणाऱ्या बातम्यांचं मुख्यमंत्र्यांकडून खंडण; म्हणाले..;